पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी जनकल्याणकारी काम - डॉ.भारती पवार
नाशिक :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी विठेवाडी,लोहणेर,महालपाटणे,मेशी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले असून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर पहायचे आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प उपस्थित नागरिकांनी यावेळी केला.
प्रसंगी आमदार डॉ राहुल आहेर, केदा नाना आहेर , शंकरराव वाघ ,सुनील पाटील,डॉ आत्माराम कुंभार्डे, दादा जाधव, योगेश आबा आहेर,चंदू दादा देवरे,सोनाली ताई राजे,भूषण कासलीवाल,देवा वाघ, जितू अण्णा आहेर, राजु देवरे, जगदीश पवार, अतुल पवार,यशवंत शिरसाठ, किशोर आहेर, कैलास पवार, राहुल केदारे, विश्वास पवार,वैभव पवार, बाबा पवार, सचिन शेवाळे,किशोर चव्हाण,नानू आहेर सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment