पाचव्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४५ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.


पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात २२, दिंडोरी – १५, नाशिक – ३६, पालघर – १३, भिवंडी – ३६, कल्याण – ३०, ठाणे – २५, मुंबई उत्तर – २१, मुंबई उत्तर पश्चिम – २३, मुंबई उत्तर पूर्व – २०,मुंबई उत्तर मध्य – २८, मुंबई दक्षिण मध्य – १५, आणि मुंबई दक्षिण –  १७ असे एकूण  ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार दिनांक ६ मे २०२४ आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला