पोस्ट्स

‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

इमेज
बारामती, दि.१३ :- जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन या गावातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव,माळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते,उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड,तहसीलदार स्वप्नील रावडे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के,आयडीबीआयचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष कुमार,फोरमचे सदस्य आदी उपस्थित होते.श्रीमती पवार म्हणाल्या,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया-बारामतीच्या माध्यमातून मागील ...

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा सुरक्षा मुद्रणातील उत्कृष्टतेचा शतकपूर्ती सोहळा संपन्न

इमेज
नाशिक :- इंडिया सिक्युरिटी प्रेसने (भारतीय सुरक्षा मुद्रणालय) 7 मार्च 2026 रोजी आपल्या स्थापनेचा शतकपूर्ती दिवस साजरा केला. शताब्दी सोहळ्याला अर्थ मंत्रालयाच्या सचिव (आर्थिक व्यवहार) अनुराधा ठाकूर, अपर्णा भाटिया, विजय रंजन सिंह, दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या सुचिता अनंत जोशी; आणि देवेंद्र कुमार रथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.   अर्थ मंत्रालयाचे सचिव (आर्थिक व्यवहार), यांच्या हस्ते शताब्दी द्वार आणि शताब्दी उद्यानाच्या उद्घाटनाने या शताब्दी सोहळ्याची सुरुवात झाली. आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शताब्दीनिमित्त एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. सुरक्षा मुद्रणाशी संबंधित महत्त्वाची आणि सार्वभौम कार्ये पार पाडून, आयएसपी, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.एसपीएमसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंह यांनी नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस,या दोन युनिट्सच्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले...

जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम;‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’चेही उद्घाटन

इमेज
  नाशिक,१२मार्च :-जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ.विपुल गट्टाणी,नेफ्रोलॉजिस्ट डॉ. इरावती वाघमारे, युरोलॉजिस्ट डॉ.श्याम तलरेजा तसेच सीव्हीटीएस तज्ज्ञ डॉ.प्रणव माळी उपस्थित होते.तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनीचे आजार वाढण्यामागील कारणे,त्यांचे निदान आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.डॉ.विपुल गट्टाणी यांनी सांगितले की,मधुमेह,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे न दिसल्यामुळे अनेकदा उशिरा लक्षात येतात.त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी,रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.डॉ.इरावती वाघमारे यांनी किडनीच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करताना सांग...

गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
महाराष्ट्रात ४४,७१० कोटींची गुंतव णूक  आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार  ७,०३० रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगसमूहांसाठी राज्य शासनाने सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली असून गुंतवणुकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळामुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवन,मुंबई येथे उद्योग विभागाच्या वतीने आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार  करण्यात आले.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगण, उद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार तसेच आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 7,030 रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्य शासनाने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी केली आहे.शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो,असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे.त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास श...

महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वांत मजबूत; २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’चे लक्ष्य मुंबई, दि. ११ :- राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत उत्तर देताना बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेत सुमारे ८४ सदस्यांनी सहभाग घेतला होता.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती,कर्जाचे प्रमाण,सिंचन,वीज,उद्योग,पायाभूत सुविधा,जलजीवन मिशन,प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज ...

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा - मंत्री गिरीश महाजन

इमेज
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक मुंबई,दि.१० :- नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ,तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार,भूमी अभिलेख उपसंचालक,निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की,सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान...

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

इमेज
जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ मुंबई,दि.१०:- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री च...