पोस्ट्स

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात 4K, 3D आणि ICG तंत्रज्ञानासह अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणालीची भर

इमेज
अशोका मेडिकव्हर सर्जिकल विभागात 4K,3D ICG तंत्रज्ञानासह अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणाली विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक 4K, 3D आणि ICG (Indocyanine Green) तंत्रज्ञानावर आधारित लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातील सूक्ष्म रचना अधिक स्पष्ट, त्रिमितीय (3D) स्वरूपात आणि अचूकपणे पाहता येतात,ज्यामुळे शस्त्रक्रियेची गुणवत्ता आणि सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढते.सर्जिकल विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ.संदीप सबनीस,यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली कार्यरत राहणार असून, त्यांच्या सर्जिकल टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता आणि डॉ. उर्विक पटेल यांचा समावेश आहे. अनुभवी टीम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयामुळे रुग्णांना अधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह उपचार मिळणार आहेत.या प्रणालीतील 4K तंत्रज...

कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात बैठक मुंबई,दि.१७:- आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोळ गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात आयोजित बैठकीत सांगितले.बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे,उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,गृह राज्यमंत्री योगेश कदम,खासदार सुनील तटकरे,आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर,दीपक केसरकर,भास्कर जाधव,महेंद्र दळवी,निलेश राणे,राजेंद्र गावित, प्रसाद लाड, किरण सामंत,ज्ञानेश्वर म्हात्रे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते.तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी ब...

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा; माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुंबई,दि.१७:- नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण राहता यावे यासाठी राज्यात सुरक्षित व गुन्हेमुक्त शहरे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्य शासन आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असून सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे मजबूत करण्याचादेखील समावेश आहे. येत्या काळात सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.माहिती व तंत्रज्ञान विभागाने गृह,नगरविकास विभागाच्या समन्वयातून सीसीटीव्ही यंत्रणेच्या प्रभावी उपयोगासाठी,शहरांमधील खासगी सीसीटीव्ही डेटाचा गुन्हे तपासासाठी उपयोग करणे आणि शूटिंग बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी महामंडळाची निर्मिती करावी,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.विधानभवन येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,माहिती व तंत्रज्ञ...

जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
विधानभवन येथे जल प्रवासी वाहतुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई, दि.१७ :- “मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सुरू झाली.बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह महाराष्ट्र सागरी मंडळाचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.उपस्थित होते. जल प्रवासी वाहतुकीसाठी बोटीची बांधणी राज्यातील शिपयार्डमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील सर्वात मोठी शिपयार्ड सुविधा विकसित करताना त्यावर आधारित सुनियोजित विकास करण्यासाठी कार्यवाही करताना गुणवत्तेची कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या.“जल प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटीची बांधणी आपल्याच शिपयार्डमध्ये व्हावी.दुसऱ्या फेजमध्ये यावर कार्यवाही होण्यासाठी प...

भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

इमेज
मुंबई,दि.१७:- नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व सहा मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या एका १७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.शिष्टमंडळामध्ये भारतीय नौदल,वायुदल व स्थलसेनेतील ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी तसेच राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय रशिया,ओमान,इंडोनेशिया, नायजेरिया,नेपाळ व टांझानिया या मित्र देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज येथील वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ सध्या मुंबई व पुणे येथे अभ्यास दौऱ्यावर आले आहे.

विद्यापीठांनी ‘स्कूल - कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी‘स्वयंसिद्धा’उपक्रम कसोशीने राबवावेत - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

इमेज
अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना मुंबई,दि.१७:- राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधरावे व त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे,अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने विद्यापीठांनी शाळा – शाळांशी संपर्क वाढवावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे.या दृष्टीने ‘स्कुल – कनेक्ट’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे,अशी महत्वाची सूचना राज्यपालांनी केली.हा कार्यक्रम राबवताना नवीनता व चाकोरीबाहेरच्या संकल्पना रुजू कराव्या असेही राज्यपालांनी सांगितले.महिला सक्षमीकरण तसेच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सुरु केलेला ‘स्वयंसिद्धा’हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असून तो देखील विद्यापीठ...

क्रांतीकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र लावण्याची मागणी

इमेज
नाशिक :- नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव,मातंग समाज बांधवांच्या वतीने वेळोवेळी नाशिक महापालिका सभागृहात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,भगवान बिरसा मुंडा तसेच लोकशाहिर अण्णाभाऊ साठे,यांचे छायाचित्र लावण्याची मागणी पुढे येत होती त्याच अनुषंगाने आज महापौर हिमगौरी आहेर आडके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळेकर,नगरसेविका रुपाली निकुळे मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सोमनाथ खाणे,विशाल मोरे,राहुल तारडे,परवेज शेख, यांच्यासह आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.