पोस्ट्स

ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी दोन कोटी ७८ लाखांच्या मुद्देमालासह इसम ताब्यात

इमेज
नाशिक :- दिनांक २०/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात असलेल्या एम.आय.टी.सी. रोलिंग मिल प्रा. लि. कंपनीच्या बाहेर पार्किंगमध्ये एक टोळी सक्रिय होती.स्टील (आसरी) वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे चालक एकमेकांशी संगनमत करून, अंधाराचा फायदा घेऊन एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये स्टील काढून ते काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत होते.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले.एम.आय.टी.सी. रोलिंग मिल कंपनीच्या बाहेरील मोकळ्या जागेत छापा टाकून खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले: ताब्यात घेतलेले आरोपी: १) अझरुद्दीन सादीक शेख (वय ३६, रा. नानावली, जुने नाशिक) २) अरुण गणपत खांदवे (वय ३८, रा. ऋषीदास सोसायटी,कलानगर, म्हसरूळ,नाशिक) ३) अमर घाडगे (रा.भराडवाडी, दिंडोरी, जि. नाशिक - फरार) ४) वकार सगीर अहमद (वय २५, रा. गोपालपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश - चालक) ५) हरेंद्र बळीराम यादव (वय २७, रा. मिलनखुर्द, जि. संत कबीर...

व्‍होल्‍वो कार इंडिया आणि चार्जझोन यांच्‍याकडून इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन लाँच

इमेज
ईगतपुरी :- ईगतपुरी मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत नाशिक,१९फेब्रुवारी स्वीडिश लक्‍झरी कार ब्रँड व्‍होल्‍वो कार इंडिया आणि भारतातील सर्वात मोठे ईव्‍ही चार्जिंग नेटवर्क चार्जझोन यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले.या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये ३६० केडब्‍ल्‍यू स्‍टार चार्ज पॉवर युनिटसह दोन डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्‍पेन्‍सर्स आहेत.हे चार्जिंग स्‍टेशन इगतपुरीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावरील फूड हिल्‍स येथे स्थित आहे.हे उद्घाटन देशभरात प्रीमियम सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्‍यासाठी त्‍यांच्‍या सहयोगामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे.हे इंटेलिजण्‍ट कॉन्फिग्‍युरेशन व्‍होल्‍वो ग्राहक आणि इतर ईव्‍ही वापरकर्त्‍यांना सानुकूल ऊर्जा वितरण,कमी प्रतिक्षा कालावधी व वास्‍तविक विश्वामध्‍ये जलद चार्जिंग अनुभव देते. महाराष्‍ट्रातील सर्वात वर्दळीच्‍या इंटरसिटी मार्गावर धोरणात्‍मकरित्‍या स्थित या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये व्‍होल्‍वो ईव्‍हींसाठी समर्पित बे आहेत. तसे...

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक - मंत्री नितेश राणे

इमेज
केंद्र-राज्य समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची ग्वाही मुंबई,दि.१८ :- काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देत स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.केंद्र व राज्य शासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (केसीओ) असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मितीला वेग येईल,नि...

'ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’: भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे सूत्र ओळखून परकीय सत्तेला रोखण्यासाठी स्वदेशी आरमार, अभेद्य जलदुर्गांचे कवच उभारले. त्यांची हीच दूरदृष्टी आणि ‘आत्मनिर्भर’ विचारसरणी आजही भारताच्या सागरी सुरक्षेचा अभेद्य पाया आहे.छत्रपती शिवरायांच्या जयंती त्यानिमित्त या विषयावर थोडक्यात टाकलेला प्रकाश.सतराव्या शतकातील भारताची राजकीय स्थिती पाहिली,तर एका विचित्र विरोधाभासाचे दर्शन घडते.उत्तरेकडे मोगलांचे साम्राज्य शिखरावर होते.जमिनीवर त्यांची ताकद अफाट होती,पण समुद्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित होती.याउलट,भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात परकीय सत्तांनी धुमाकूळ घातला होता.पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की,खुद्द मोगल बादशहालाही मक्केला यात्रेसाठी जायचे असेल, तर पोर्तुगीजांकडून ‘काटाझ’ (Cartaz) नावाचा परवाना घ्यावा लागत असे.हा परवाना नसेल,तर जहाजे बुडवली जात किंवा जप्त केली जात. भारतीय व्यापाऱ्यांची अवस्था तर त्याहून दयनीय होती.परकीय सत्तांच्या या ‘...

नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंम्मेलनाचे दि.२२ फेब्रुवारी रोजी आयोजन

इमेज
नाशिक :- समस्त शिंपी,दर्जी समाजाचे रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासम्मेलन होणार असून संपूर्ण भारतातील समस्त शिंपी समाजातील पोटजाती यानिमित्ताने एकत्र येत आहेत.या महासम्मेलनात राजस्थान येथील पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला,गुजरातचे पद्मश्री कनुभाई टेलर,प्रवीणभाई दर्जी,आणि संत मंडळी,राजकीय प्रतिभावान समाजबंधू,भजनी मंडळे यांचा सहभाग होणार आहे.या कार्यक्रमाला देशपातळी वरील मान्यवर उपस्थित राहणार असून यावेळी संत नामदेव महाराज विश्वरत्न पुरस्काराने सड़क परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय,भारत सरकार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान,केंद्रीय कृषि मंत्री प्रल्हाद जोशी,उपभोक्ता मामले,खाद्य आणि सार्वजनिक वितरण तथा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री,भारत सरकार खा.प्रणीती शिंदे, सरहद्द संस्था पुणे येथील अध्यक्ष संजय नहार,खा.अनिल बोंडे,संजय खोडके,आ.सुलभा खोडके,आ....

भंडाऱ्यात न्हाली गोदातीर ४६ वर्षांनंतर मऱ्हळच्या खंडोबाची गोदावरीशी भेट

इमेज
करंजी खुर्द येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न  नाशिक :- श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,यांचे वंशज यांची सोहळ्यास उपस्थिती'यळकोट यळकोट जय मल्हार मार्तंड भैरवाचा' आणि 'सदानंदाचा येळकोट' अशा जयघोषात,प्रतिजेजुरी मऱ्हळ येथील खंडोबा महाराज पालखी तब्बल ४६ वर्षांनंतर गोदावरी नदीच्या भेटीसाठी करंजी खुर्द येथे दाखल झाली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी करंजी खुर्द येथील ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळांनी स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन,पिण्याचे पाणी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा केली या महाशिवरात्री यात्रोत्सवात भक्ती,परंपरा आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम पहावयास मिळाला.पालखी करंजी खुर्द सिन्नर तालुका व निफाड तालुका सरहद्दीवरुन डि.जे लावुन भंडाऱ्याची उधळण करत फट्याक्याची आतिष बाजी करत पालखीचे गोदावरी नदीच्या काठावर आगमन झाले यावेळी देवतांना गोदावरी नदी पात्रात स्नानासाठी विशेष व्यवस्था ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली होती वाकद शिरवाड्याचे सरपंच डॉ.श्रीकांत आवारे सौ. मनीषा आवारे दाम्पत्याच्या हस्ते पालखीचे विधीवत...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे २०२५ वर्षात एक हजारांच्या वर यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यासर्व शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ.सागर काकतकर,डॉ.जयेश सोनजे, डॉ.श्रीकांत जाधव आणि डॉ.राहुल सुपे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया,अचूक निदान,रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.या १००० शस्त्रक्रियांमध्ये गुडघा व खुबा प्रत्यारोपण (Joint Replacement), लिगामेंट पुनर्बांधणी (Ligament Reconstruction), फ्रॅक्चर व्यवस्थापन, आर्थ्रोस्कोपी तसेच इतर जटिल हाड व सांध्यांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.तसेच,अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही गुडघा व सांध्यांच्या शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने पार पाडण्यात आल्या. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील नेमकेपणा वाढतो,इम्प्लांटचे अचूक पोझिशनिंग करता ...