पोस्ट्स

जवानांचे मनोबल वाढणार! माओवादाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष सन्मान

इमेज
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद मुंबई,दि.30 :- माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली.या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच भारतीय पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.गडचिरोलीसारख्या भागात आता विकासाचे नवे चित्र उभे राहत असून लोकशाहीची मुळे बळकट होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली असून आता तिच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणे हे पुढील मोठे आव्हान आहे. या संघर्षात 244 पोलीस कर्मचारी शहीद झाले, तर 609 नागरिका...

नाशिक महानगरपालिका,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पुरवठा जाहिर निवेदन

इमेज
नाशिक :- संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि. ०४ व रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित असुन या दोन दिवस संपूर्ण नाशिक शहरात खालील नमूद परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.संपुर्ण नाशिक शहरात दोन दिवसांचा शट डाऊन कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार असुन मक्तेदार व कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे. नाशिक पुर्व विभाग १) नाशिक पुर्व प्र.क्र. ३० मधील कलानगर जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाची गुरुत्व वाहीनी मुख्य ७०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहीनीला जोडणे मक्तेदार मेघ कंस्ट्रुवेल कालावधी अंदाजे २४ तास २) गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र लक्ष्मी सिव्हील इंजिनिअर नाशिक पश्चिम विभाग १) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठया प्रमाणत असलेले ३०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन लिकेजचे काम बंद करणे      २) पी ॲन्ड टी कॉलनी येथे २०० मी.मी. व्यासाचा ए...

नगरसचिवांसह सोळा अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त

इमेज
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ) नाशिक,दि.३०:- महानगरपालिकेच्या सेवेतून मनपाचे नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांच्यासह १६ अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत नगरसचिव या पदावर कार्यरत असणारे जेष्ठ मदन हरिश्चंद्र हे ३७ वर्षाच्या मनपा सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,यांच्या हस्ते मनपा पदाधिकारी,गटनेते,नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत महासभेत करण्यात आला.कामगार कल्याण विभागाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सत्कार मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले राजाराम जाधव,विभागीय अधिकारी मनोहर पगारे,बिगारी,वसंत वाघ, कामाठी,संजय हिरवे,शिपाई,संतोष खर्डे,स्वच्छता मुकादम,श्रीमती देवलबेल वाघेला,सफाई कर्मचारी, ज्ञानेश्वर पव...

निधन वार्ता

इमेज
इंदिरानगर :- येथील वनवैभव कॉलनीतील राहिवाशी सुशीला जयराम काठे(वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलं,एक मुलगी,जावई,सुना,नातू,पणतू असा परिवार आहे.त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याच्या मामी व हॉटेल मामा का ढाबाचे संचालक मंगेश काठे व संजय काठे याच्या मातोश्री होत्या.

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५११ असाक्षर व्यक्तींच्या सहभाग

इमेज
नाशिक :- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर पार पडल्या.त्यात १५११ असाक्षर व्यक्तींनी सहभाग नोंदविला.केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत रविवार,दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.००ते दुपारी ५.०० या वेळेत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLNAT) चाचणी घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण १५११ असाक्षर व्यक्ती सहभागी झाल्या असून,ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षा केंद्रावर २२४ केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली होती.तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहे.मनपा प्रशासनाच्या वतीने व मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहभागातून ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे. डॉ. मिता चौधरी - प्रशासनाधिकारी म...

प्रशासनात पारदर्शकतेचा नवा अध्याय! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला 'त्रिसूत्री'चा मंत्र

इमेज
प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई, दि. २८ : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य ...

महाराष्ट्रात आता उद्योगांची चांदी! परवानग्या होणार सुलभ आणि वीजदरही घटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

इमेज
उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ व ‘लाइफ सायन्सेस हब’उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ,उद्योग प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन,वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना विश्वासपूर्वक सांगितले की,राज्यातील वीजदर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत.सध्या असलेला ₹10.88 प्रति युनिट हा वीजद...