पोस्ट्स

शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

इमेज
बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव मुंबई दि. ०२:- पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व.अजित (दादा) पवार’यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या 3 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.त्यानंतर 20 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व 100 रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.या दोन्ही संस्था ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरली आहेत.येथे विशेषज्ञ वैद्यकीय सेवा,आपत्कालीन उपचार,शस्त्रक्रिया सुविधा तसेच आयुर्वेद उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत.परिणामी,पुणे शहरावरील तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व ...

पोलीसांनी गस्ती दरम्यान गुन्ह्यातील चोरट्याला घेतले ताब्यात

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिकरोड :- रेल्वे पोलीस ठाणे तील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, व पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळे,आर पी एफ आरक्षक कृष्ण यादव,नाशिक रोड यांची पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीतील धडाडीची कामगिरी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल के के यादव यांचे सह गुन्हेगारांवर वॉच व गुन्ह्यास प्रतिबंधक करणे करिता गस्त करत असताना गु र नंबर 224/25 मधील आरोपीत नामे अर्जुन उर्फ अरुण काळ्या संजय पवार राहणार सुभाष रोड नाशिक रोड नाशिक हा संशयित रित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे मध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 कलम 305 सी मधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 15000हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून सदर आरोपीत हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांचे मोबाईल व सामान चोरी करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्याकडे अजून चौकशी करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी ही लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर येथील माननीय पोलीस अधीक्षक...

वणी येथे अल्पवयीन मुलगी माथेफिरू तरुणाच्या छळाचा बळी

इमेज
गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील वणी येथे एक अल्पवयीन हिंदु मुलगी लव्ह जिहादची बळी पडली असून मागील चार वर्षांपासून एक मुस्लिम युवक तिला मानसिक त्रास देत होता.अखेर या कुटुंबाने वणी येथुन नाशिकला स्थलांतर केले तरी सुध्दा या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई वडील व भावाला त्रास सुरूच राहीला.माझ्याबरोबर लग्न कर नाही तर तुझ्या आई वडिलांचा खुण करू अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती.मुलीने अखेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये ती वाचली.सदर मुलगी हुशार असुनही केवळ भितीपोटी मुलीच्या आई वडिलांनी तिला १२ वी परीक्षेत बसु दिले नाही व घरातच ठेवले.या मुस्लिम कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा असुन केवळ भितीपोटी स्थानिक कोणीही पुढे येत नाही.भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे जेव्हा या मुलीच्या आई वडिलांनी तक्रार केली तेव्हा चक्र फिरले व गुन्हा दाखल झाला.या प्रकरणात वणी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी सहभागी असुन गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध केले.व त्याला परर...

सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा

इमेज
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांचे निर्देश मुंबई,दि.०२:- गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली.यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर,समाज कल्याण उपायुक्त स्वाती इथापे, सामाजिक न्याय विभागाच्या अवर सचिव प्रज्ञा देशमुख,मुंबई शहरचे सहायक संचालक प्रसाद खैरनार,मुंबई उपनगरचे सहायक संचालक रविकिरण पाटील तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल म्हणाले,पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबांना शासनाच्या तरतुदीनुसार पूर्ण नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्याला नोकरी देणे अपेक्षित आहे,त्या बाबीही तत्काळ मार्गी लावाव्यात. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अन...

श्रेया डोंगरे सीए परीक्षा उत्तीर्ण

इमेज
नाशिक - गंगापूर रोड परिसरातील राहिवाशी संजय डोंगरे अकाउंटंट यांची कन्या श्रेया ही चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून उत्तीर्ण झाली.यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.जिद्द,चिकाटी,मेहनत सर्व कुटुंबीयांची तसेच मित्र-मैत्रिणींची साथ यामुळेच मला हे यश संपादन करता आले,असे श्रेयाने सांगितले.

जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक - डॉ. पंकज भट

इमेज
नाशिक :- ३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे.या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर,श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. डॉ.भट यांनी सांगितले की,ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे,तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे.हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.तोंडाने श्वास घेणे,झोपताना घोरणे (स्नोरिंग),वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना दिसतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, दिवसभर थकवा जाणवतो आणि शालेय कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कानाचे वार...

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य

इमेज
मुंबई, दि. २८ :- दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री (टूलकिट) खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.पूर्वी या योजनेद्वारे एक हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे,याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे.दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर,इलेक्ट्रिकल कामे,सुतारकाम,वाहन दुरुस्ती,किरकोळ व्यवसाय इत्यादी...