पोस्ट्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

इमेज
मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री  कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा नाशिक दि. २७ :- कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल.नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत,महापौर हिमगौरी आहेर- आडके, खासदार डॉ.शोभा बच्छाव,खासदार राजाभाऊ वाजे,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका,जर...

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण मुंबई, दि. २६ : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहे,ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभा...

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट - भरत कळसकर,परिवहन आयुक्त

इमेज
मुंबई,दि.२५ :- राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे.म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे.त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.नंदूरबार येथे ५० टक्के,सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के,सिंधुदुर्ग येथे २९ टक्के,वर्धा येथे २८ टक्के,धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठ...

मुंबईत २७, २८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा - सभापती रवींद्र साठे

इमेज
ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन मुंबई, दि. 24 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.रविंद्र साठे यांनी सांगितले की,केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय,यांचे कार्यालय,घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे.हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत सर्वांसाठ...

संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

इमेज
नागपूर :- गडकरी यांनी संत नामदेव महाराजांचा वारसा पुढे नेऊन लोकांची मने जिंकली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराजांचा वारसा आणि सामाजिक एकतेचा त्यांचा संदेश पुढे नेल्याबद्दल 'संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार'नागपूर येथे प्रदान करण्यात आला.नागपूर शहरातील रेशमबाग मैदानावर आयोजित 'राष्ट्रीय एकता जागतिक परिषदे'दरम्यान त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी गडकरी म्हणाले की,संत नामदेव महाराजांनी समाजातून विषमता दूर करून एकतेचा मार्ग दाखवला.त्यांच्या विचारांच्या प्रभावा मुळेच त्यांच्या शिकवणी शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट आहेत.गडकरी यांनी पंजाब मधील घुमान आणि महाराष्ट्रातील नरसी गावातील त्यांचे अनुभव सांगितले आणि संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज विठ्ठल महाराज,देवनाथ मठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराज,सतपाल महाराज,प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव आणि मुख्य समन्वयक ईश्वर धिरडे भानुमती गुजरणिया आदि उपस्थित होते.गडकरी यांनी पंजाब मधील घुमा...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

इमेज
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा (IR Procedures) महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अमोल भालेकर, यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते.या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून,मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली (CT, Ultrasound, Angiography) उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो.या ५०० प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार,ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स उपचार,बायोप्सी,ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस कॅथेटर बसविणे,तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे.अत्याधुनिक उपकरणे,अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम या...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ हरपला - मंत्री छगन भुजबळ

इमेज
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ भावनिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून शोक व्यक्त मुंबई,दि.२३ फेब्रुवारी :- दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता.महाराष्ट्राच्या राजकारणातील एक‘आधारवड’आज उन्मळून पडला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक भावना व्यक्त केल्या.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर दिवंगत व्यक्तींचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.या शोकप्रस्तावावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,आज महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे लाडके‘दादा’अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मन अतिशय हेलावून गेले आहे.१९८५ पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला,पण दादांसाठी शोकप्रस्ताव मांडावा...