पोस्ट्स

मुंबईत २७, २८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा - सभापती रवींद्र साठे

इमेज
ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन मुंबई, दि. 24 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.रविंद्र साठे यांनी सांगितले की,केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय,यांचे कार्यालय,घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे.हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत सर्वांसाठ...

संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

इमेज
नागपूर :- गडकरी यांनी संत नामदेव महाराजांचा वारसा पुढे नेऊन लोकांची मने जिंकली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराजांचा वारसा आणि सामाजिक एकतेचा त्यांचा संदेश पुढे नेल्याबद्दल 'संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार'नागपूर येथे प्रदान करण्यात आला.नागपूर शहरातील रेशमबाग मैदानावर आयोजित 'राष्ट्रीय एकता जागतिक परिषदे'दरम्यान त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी गडकरी म्हणाले की,संत नामदेव महाराजांनी समाजातून विषमता दूर करून एकतेचा मार्ग दाखवला.त्यांच्या विचारांच्या प्रभावा मुळेच त्यांच्या शिकवणी शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट आहेत.गडकरी यांनी पंजाब मधील घुमान आणि महाराष्ट्रातील नरसी गावातील त्यांचे अनुभव सांगितले आणि संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज विठ्ठल महाराज,देवनाथ मठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराज,सतपाल महाराज,प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव आणि मुख्य समन्वयक ईश्वर धिरडे भानुमती गुजरणिया आदि उपस्थित होते.गडकरी यांनी पंजाब मधील घुमा...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण

इमेज
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा (IR Procedures) महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अमोल भालेकर, यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते.या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून,मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली (CT, Ultrasound, Angiography) उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो.या ५०० प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार,ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स उपचार,बायोप्सी,ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस कॅथेटर बसविणे,तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे.अत्याधुनिक उपकरणे,अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम या...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ हरपला - मंत्री छगन भुजबळ

इमेज
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ भावनिक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलतांना मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून शोक व्यक्त मुंबई,दि.२३ फेब्रुवारी :- दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता.महाराष्ट्राच्या राजकारणातील एक‘आधारवड’आज उन्मळून पडला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक भावना व्यक्त केल्या.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतर दिवंगत व्यक्तींचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.या शोकप्रस्तावावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,आज महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे लाडके‘दादा’अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मन अतिशय हेलावून गेले आहे.१९८५ पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला,पण दादांसाठी शोकप्रस्ताव मांडावा...

दैनिक सनातन प्रभातचा वर्धापन दिनी साजरा

इमेज
वाचक,हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा अविष्कार !  ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे ! - श्री. दुर्गेश परूळकर, व्याख्याते  नाशिक :- समाजाची धारणा,राष्ट्राचे स्थैर्य आणि स्वातंत्र्य हे केवळ राजसत्तेवर अवलंबून नाही,तर संस्कारांवर अवलंबून आहे.संस्कार विस्कळीत अथवा नाहीसे झाले,तर समाज भरकटत जाईल हे संतांनी ओळखले.त्यामुळे त्यांनी समाजात सुसंस्कारांचे बीज पेरले.त्याला उच्च नैतिकतेचे खतपाणी घातले.सांस्कृतिक अभंगता हे आपल्या देशाचे बळ आहे,सामर्थ्य आहे.ही अभंगता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे.तरी संस्कृती आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेले व्रतस्थ धर्म रक्षकच राष्ट्राचे खरे वीर आहेत.त्यामुळे‘व्रतस्थ धर्मरक्षक’हे दोन शब्द दैनिक‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे,असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत दुर्गेश परुळकर,यांनी यावेळी काढले.२२ फेब्रुवारीला शंकराचार्य न्यास संकुल,डॉ.कु...

गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची - राजेश गाडगीळ

इमेज
नाशिक :- गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.अपघात कमी करण्या साठी जागरूकता आणि योग्य प्रशिक्षण खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ञ राजेश गाडगीळ,यांनी केले.सातपूर येथील नॅब सभागृहात नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देणाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी राजेश गाडगीळ,बोलत होते ते म्हणाले की गिर्यारोहकांना पर्वतांच्या भौगोलिक परिस्थिती,हवामान,आणि शारीरिक शक्ती याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.अर्धवट माहितीच्या जोरावर चुकीच्या आत्मविश्वासामुळे सध्या गिर्यारोहण क्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढले प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृती करणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन केले.संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देऊन सहकार्य केलेले प्रमुख अतिथी नंदू चव्हाण, भगवान चवले,भरत वखारिया,संजय अमृतकर आदींचा संस्थेच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त  करून चर्चासत्रा प्रसंगी उपस्थितांच्या  शंकांचे निरसन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितितां मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता ऋतिक मारणे,याचा सत्कार करण्यात आला या चर्चासत्राचे सूत्रसंचालन तेज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

इमेज
नवी दिल्ली, दि. २० :-  नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले.तसेच विविध मान्यवरांच्या भेटी,बैठकांमध्ये सहभागी होत  सामंजस्य करार केले.याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले.   अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी! ओपन एआयचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अझीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. ओपन एआय आणि रॉकेट लर्निंगशी भागिदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याचा लाखो अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे. भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्य...