पोस्ट्स

प्रभाग क्रमांक २३ मधील पाणीपुरवठा,अतिक्रमण प्रश्नी ठिय्या आंदोलन निवेदन सादर

इमेज
नाशिक :- प्रभाग क्रमांक २३ मधील विविध ठिकाणावरील तसेच लाॅन्स अतिक्रमण प्रश्नी उपायुक्त सुरेखा देखणे,यांची प्रभागातील नगरसेवक नागरिकांनी भेट घेत निवेदन सादर केले.यावेळी उपायुक्त देखणे यांनी लवकरच अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.तसेच यावेळी कमोद नगर, इंदिरानगर,खोडे नगर, विधाते नगर,साईनाथ नगर,अमृतवर्षा काॅलनी, दिपाली नगर,विनय नगर, शिवाजी वाडी,नंदीनी नगर शिवसृष्टी काॅलनी,भारत नगर, सुचिता नगर,चिस्तीया काॅलनी,आदी भागात अवेळी कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठा बाबत अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.निवेदन देण्यात आले. प्रभागात पाणीपुरवठा योग्य दाबाने सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेविका रुपाली निकुळे,मंगला नन्नावरे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे, प्रभागातील महिला नागरिक सचीन कुलकर्णी,प्रकाश नन्नावरे,सरला थोरात, लक्ष्मी जाधव,अनुसया पवार, अनिता जाधव,विमल पवार, सुशीला महाले,सोनाली मोरे,आदींसह उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकाबाबत पुनर्वसन बैठक मुंबई, दि. १३:- बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा.पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे.निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत दिले.उद्यानातील अतिक्रमणधारकांना पुनर्वसन होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.मुलुंड आणि ठाणे बाजूकडील अतिक्रमणधारकांनाही पुनर्वसनासाठी त्या बाजूकडील जागांचा शोध घेऊन नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.बैठकीला वन मंत्री गणेश नाईक,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले,आमदार सर्वश्री राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, राजेंद्र गावित, मिहिर कोटेचा उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फ...

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
मुंबई, दि.१३:- धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्या सोबत बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात येईल,जेणेकरुन धनगर बांधवाच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणासंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली,त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे ऐतिहासिक योगदान भरीव आहे.धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत धनगर समाजातील या विषयाचा अभ्यास असलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन तातडीने करण्यात येईल.त्यातुन आरक्षणासाठीची कायदेशीर दिशा स्पष्ट होईल. कायद्याच्या चौकटीत ...

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

इमेज
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण मुंबई,दि.१३ :- सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे,खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले गुवाहाटी येथील समारंभात“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी”चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा झाला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्ग...

‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

इमेज
बारामती, दि.१३ :- जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन या गावातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव,माळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते,उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड,तहसीलदार स्वप्नील रावडे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के,आयडीबीआयचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष कुमार,फोरमचे सदस्य आदी उपस्थित होते.श्रीमती पवार म्हणाल्या,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया-बारामतीच्या माध्यमातून मागील ...

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा सुरक्षा मुद्रणातील उत्कृष्टतेचा शतकपूर्ती सोहळा संपन्न

इमेज
नाशिक :- इंडिया सिक्युरिटी प्रेसने (भारतीय सुरक्षा मुद्रणालय) 7 मार्च 2026 रोजी आपल्या स्थापनेचा शतकपूर्ती दिवस साजरा केला. शताब्दी सोहळ्याला अर्थ मंत्रालयाच्या सचिव (आर्थिक व्यवहार) अनुराधा ठाकूर, अपर्णा भाटिया, विजय रंजन सिंह, दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या सुचिता अनंत जोशी; आणि देवेंद्र कुमार रथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.   अर्थ मंत्रालयाचे सचिव (आर्थिक व्यवहार), यांच्या हस्ते शताब्दी द्वार आणि शताब्दी उद्यानाच्या उद्घाटनाने या शताब्दी सोहळ्याची सुरुवात झाली. आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शताब्दीनिमित्त एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. सुरक्षा मुद्रणाशी संबंधित महत्त्वाची आणि सार्वभौम कार्ये पार पाडून, आयएसपी, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.एसपीएमसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंह यांनी नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस,या दोन युनिट्सच्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले...

जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम;‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’चेही उद्घाटन

इमेज
  नाशिक,१२मार्च :-जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ.विपुल गट्टाणी,नेफ्रोलॉजिस्ट डॉ. इरावती वाघमारे, युरोलॉजिस्ट डॉ.श्याम तलरेजा तसेच सीव्हीटीएस तज्ज्ञ डॉ.प्रणव माळी उपस्थित होते.तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनीचे आजार वाढण्यामागील कारणे,त्यांचे निदान आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.डॉ.विपुल गट्टाणी यांनी सांगितले की,मधुमेह,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे न दिसल्यामुळे अनेकदा उशिरा लक्षात येतात.त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी,रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.डॉ.इरावती वाघमारे यांनी किडनीच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करताना सांग...