'ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’: भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्यापाशी आरमार, त्याचा समुद्र’ हे सूत्र ओळखून परकीय सत्तेला रोखण्यासाठी स्वदेशी आरमार, अभेद्य जलदुर्गांचे कवच उभारले. त्यांची हीच दूरदृष्टी आणि ‘आत्मनिर्भर’ विचारसरणी आजही भारताच्या सागरी सुरक्षेचा अभेद्य पाया आहे.छत्रपती शिवरायांच्या जयंती त्यानिमित्त या विषयावर थोडक्यात टाकलेला प्रकाश.सतराव्या शतकातील भारताची राजकीय स्थिती पाहिली,तर एका विचित्र विरोधाभासाचे दर्शन घडते.उत्तरेकडे मोगलांचे साम्राज्य शिखरावर होते.जमिनीवर त्यांची ताकद अफाट होती,पण समुद्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित होती.याउलट,भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः कोकणात परकीय सत्तांनी धुमाकूळ घातला होता.पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. परिस्थिती इतकी बिकट होती की,खुद्द मोगल बादशहालाही मक्केला यात्रेसाठी जायचे असेल, तर पोर्तुगीजांकडून ‘काटाझ’ (Cartaz) नावाचा परवाना घ्यावा लागत असे.हा परवाना नसेल,तर जहाजे बुडवली जात किंवा जप्त केली जात. भारतीय व्यापाऱ्यांची अवस्था तर त्याहून दयनीय होती.परकीय सत्तांच्या या ‘...