पोस्ट्स

अभोणा ग्रामपंचायत नळपाणी योजना कामांची चौकशी करण्याची मागणी

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे कळवण :- अभोणा ग्रामपंचायत ने निकृष्ट दर्जाचे पाईप टाकल्याचा ग्रामस्थाचा आरोप,पाईप फुटल्याने परिसरात पाण्याची तळे तयार झाले आहे रस्ता बंद झाला.यात्रा उत्सव असल्यामुळे याबाबत सरपंच,ग्रामसेवक,यांना कळवूनही दखल न घेतल्याने परिसरातील रहिवासी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनचे माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,संतप्त झाले आहे.राज्य व केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही दर्जेदार काम होत नसल्याने कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.घटनास्थळावरील परिस्थिती दाखवत त्यांनी चित्रफीत रेकॉर्ड केली असून सीईओ तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली.

त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

इमेज
नाशिक,त्र्यंबकेश्वर :- महाकुंभ २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ संपन्न झाले.महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी आखाडे,महंत,साधू-संत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत,तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये,असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.याप्रसंगी महंत साधू-संत,आखाडा परिषदेचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन यांच्या सहकार्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६ निश्चितच भव्य,सुव्यवस्थित व जागतिक दर्जाचा होईल,असा विश्वास मंत्री महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री.महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा),अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज,कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,कुं...

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा. मुंबई,दि.२ :- पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.शासकीय विभाग,विविध संस्थाबरो...

अशोका मार्ग श्री.श्री.रविशंकर मार्ग शिवजन्मोत्सव सोहळा समिती बैठक पदाधिकाऱ्यांची निवड

इमेज
नाशिक :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ईश्वर प्रतिष्ठा–२, श्री. श्री.रविशंकर मार्ग,अपोलो फार्मसी शेजारी, नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक भव्य,शिस्तबद्ध व यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन करण्यात आली.याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.अध्यक्ष अजिंक्य बाळा वाढणे,उपाध्यक्ष प्रवेन घोलु गवारे,कार्याध्यक्ष साहिल पाटील, खजिनदार महेश पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषीकेश चव्हाण,यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.नियोजन, जबाबदाऱ्या वाटप व समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.मोठ्य...

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

इमेज
नाशिक,दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले.आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर,आमदार सरोज आहिरे,माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,आनंद सोनवणे,सीमंतिनी कोक...

येवल्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने 'दादा' व्यक्तिमत्व गमावले; येवला येथील शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या शोकभावना व्यक्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोबत आणला अस्थिकलश स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने एक जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड - मंत्री छगन भुजबळ स्व.अजितदादा यांचे महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेले विचार पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.२फेब्रुवारी:-स्व.अजितदादा पवार यांचे निधनाने माझ्या आयुष्यात ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. आजही त्याचं निधन मन स्वीकारला तयार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली.यावेळी ते बोलत ह...

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र - राज्यपाल आचार्य देवव्रत

इमेज
'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन मुंबई, दि. 27 :- समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले.‘हाय ऑन कसोल’ या पुस्तकाचे लेखक,पत्रकार व अध्यापक आदित्य कांत,हे या पुस्तकाचे लेखक आहेत.पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल,असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना...