पोस्ट्स

जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक - डॉ. पंकज भट

इमेज
नाशिक :- ३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे.या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर,श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. डॉ.भट यांनी सांगितले की,ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे,तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे.हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.तोंडाने श्वास घेणे,झोपताना घोरणे (स्नोरिंग),वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना दिसतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, दिवसभर थकवा जाणवतो आणि शालेय कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कानाचे वार...

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य

इमेज
मुंबई, दि. २८ :- दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री (टूलकिट) खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.पूर्वी या योजनेद्वारे एक हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे,याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे.दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर,इलेक्ट्रिकल कामे,सुतारकाम,वाहन दुरुस्ती,किरकोळ व्यवसाय इत्यादी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

इमेज
मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री  कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा नाशिक दि. २७ :- कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल.नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत,महापौर हिमगौरी आहेर- आडके, खासदार डॉ.शोभा बच्छाव,खासदार राजाभाऊ वाजे,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका,जर...

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण मुंबई, दि. २६ : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ 15 महिन्यात पूर्ण केले आहे,ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभा...

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट - भरत कळसकर,परिवहन आयुक्त

इमेज
मुंबई,दि.२५ :- राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे.म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे.त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.नंदूरबार येथे ५० टक्के,सोलापूर शहर व वाशिम येथे प्रत्येकी ३६ टक्के,सिंधुदुर्ग येथे २९ टक्के,वर्धा येथे २८ टक्के,धाराशिव येथे २४ टक्के, गोंदिया व अमरावती ग्रामीण येथे प्रत्येकी २२ टक्के, तर नांदेड व नागपूर शहर येथे प्रत्येकी २१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.राज्य व जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठ...

मुंबईत २७, २८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा - सभापती रवींद्र साठे

इमेज
ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन मुंबई, दि. 24 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.रविंद्र साठे यांनी सांगितले की,केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय,यांचे कार्यालय,घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे.हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत सर्वांसाठ...

संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान

इमेज
नागपूर :- गडकरी यांनी संत नामदेव महाराजांचा वारसा पुढे नेऊन लोकांची मने जिंकली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संत नामदेव महाराजांचा वारसा आणि सामाजिक एकतेचा त्यांचा संदेश पुढे नेल्याबद्दल 'संत नामदेव महाराज जागतिक पुरस्कार'नागपूर येथे प्रदान करण्यात आला.नागपूर शहरातील रेशमबाग मैदानावर आयोजित 'राष्ट्रीय एकता जागतिक परिषदे'दरम्यान त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी गडकरी म्हणाले की,संत नामदेव महाराजांनी समाजातून विषमता दूर करून एकतेचा मार्ग दाखवला.त्यांच्या विचारांच्या प्रभावा मुळेच त्यांच्या शिकवणी शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट आहेत.गडकरी यांनी पंजाब मधील घुमान आणि महाराष्ट्रातील नरसी गावातील त्यांचे अनुभव सांगितले आणि संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज विठ्ठल महाराज,देवनाथ मठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराज,सतपाल महाराज,प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव आणि मुख्य समन्वयक ईश्वर धिरडे भानुमती गुजरणिया आदि उपस्थित होते.गडकरी यांनी पंजाब मधील घुमा...