दैनिक सनातन प्रभातचा वर्धापन दिनी साजरा
वाचक,हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा अविष्कार ! ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे ! - श्री. दुर्गेश परूळकर, व्याख्याते नाशिक :- समाजाची धारणा,राष्ट्राचे स्थैर्य आणि स्वातंत्र्य हे केवळ राजसत्तेवर अवलंबून नाही,तर संस्कारांवर अवलंबून आहे.संस्कार विस्कळीत अथवा नाहीसे झाले,तर समाज भरकटत जाईल हे संतांनी ओळखले.त्यामुळे त्यांनी समाजात सुसंस्कारांचे बीज पेरले.त्याला उच्च नैतिकतेचे खतपाणी घातले.सांस्कृतिक अभंगता हे आपल्या देशाचे बळ आहे,सामर्थ्य आहे.ही अभंगता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे.तरी संस्कृती आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेले व्रतस्थ धर्म रक्षकच राष्ट्राचे खरे वीर आहेत.त्यामुळे‘व्रतस्थ धर्मरक्षक’हे दोन शब्द दैनिक‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे,असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत दुर्गेश परुळकर,यांनी यावेळी काढले.२२ फेब्रुवारीला शंकराचार्य न्यास संकुल,डॉ.कु...