पोस्ट्स

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा. मुंबई,दि.२ :- पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.शासकीय विभाग,विविध संस्थाबरो...

अशोका मार्ग श्री.श्री.रविशंकर मार्ग शिवजन्मोत्सव सोहळा समिती बैठक पदाधिकाऱ्यांची निवड

इमेज
नाशिक :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ईश्वर प्रतिष्ठा–२, श्री. श्री.रविशंकर मार्ग,अपोलो फार्मसी शेजारी, नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक भव्य,शिस्तबद्ध व यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन करण्यात आली.याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.अध्यक्ष अजिंक्य बाळा वाढणे,उपाध्यक्ष प्रवेन घोलु गवारे,कार्याध्यक्ष साहिल पाटील, खजिनदार महेश पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषीकेश चव्हाण,यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.नियोजन, जबाबदाऱ्या वाटप व समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.मोठ्य...

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

इमेज
नाशिक,दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले.आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर,आमदार सरोज आहिरे,माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,आनंद सोनवणे,सीमंतिनी कोक...

येवल्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने 'दादा' व्यक्तिमत्व गमावले; येवला येथील शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या शोकभावना व्यक्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोबत आणला अस्थिकलश स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने एक जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड - मंत्री छगन भुजबळ स्व.अजितदादा यांचे महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेले विचार पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.२फेब्रुवारी:-स्व.अजितदादा पवार यांचे निधनाने माझ्या आयुष्यात ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. आजही त्याचं निधन मन स्वीकारला तयार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली.यावेळी ते बोलत ह...

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र - राज्यपाल आचार्य देवव्रत

इमेज
'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन मुंबई, दि. 27 :- समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले.‘हाय ऑन कसोल’ या पुस्तकाचे लेखक,पत्रकार व अध्यापक आदित्य कांत,हे या पुस्तकाचे लेखक आहेत.पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल,असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना...

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन

इमेज
शोकसभेस मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी राहणार उपस्थित नाशिक,दि.३१ जानेवारी :- नाशिक शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास मंदिर सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.स्व.अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.या सर्वपक्षीय शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षांचे खासदार,आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात“मोटिलिटी क्लिनिक”चा शुभारंभ

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात पचनसंस्थेशी संबंधित हालचाली (Gut Motility) आणि कार्यातील बिघाडामुळे होणाऱ्या त्रासांवर अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यासाठी “मोटिलिटी क्लिनिक” (Motility Clinic) सुरू करण्यात आले आहे.हे क्लिनिक डॉ.सोहम दोशी,डॉ.संदीप पाटील आणि डॉ. अमोल शिंदे यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना ॲसिडिटी, सतत पोट फुगणे, पोटात जडपणा,अन्न गिळताना त्रास,छातीत जळजळ,वारंवार ढेकर येणे,मळमळ,उलट्या,बद्धकोष्ठता,जुलाब, मलावरोध,तसेच“इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS)”सारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक वेळा नियमित तपासण्यांमध्ये काहीही गंभीर आढळत नाही, मात्र पचनसंस्थेची हालचाल आणि कार्यातील असंतुलन हे यामागचे मुख्य कारण असू शकते.अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना सविस्तर सल्लामसलत,लक्षणांचे शास्त्रीय मूल्यांकन,योग्य तपासण्यांचे नियोजन तसेच वैयक्तिकृत उपचार योजना देण्यात येणार आहे.यामध्ये आहार ...