पोस्ट्स

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

इमेज
मुंबई,दि.१०:- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात ल...

भांडवली बाजारातील ‘बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुंबई, दि. ९ :- महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो.नाशिक महापालिकेप्रमाणे ‘इनोव्हेटिव्ह फंड’निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते‘रिंगिंग बेल’वाजवून करण्यात आले.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप,नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी,नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,नाशिक महानगरपालिकेने एकाच आर्थिक वर्षात प्रथम खाजगी प्लेसमेंट आणि आता सार्वजनिकरित्या ...

रेल्वे पोलीसांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे ना.रोड :- नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवासी यांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी पुष्प देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले.महिला पोलीस,महिला आर पी एफ तसेच रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड  एपीआय सचिन बनकर,आर पी एफ इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील,आर पी एफ हेमंत पठारे,आर पी एफ,जी आर पी स्टाफ उपस्थित होता.

सकल मराठा परिवाराच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

इमेज
नाशिक :- सकल मराठा परिवार तर्फे महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्य आधारित चला जगू या आनंदाने या विषयावर सत्कर्म फाउंडेशन च्या अध्यक्षा ज्योती भोसले-लांडगे,यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यात महिलांनी कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे आणि आपल्या आनंदाचा आणि भावनांचा रिमोट आपल्याच हातात ठेवावा असे त्या म्हणाल्या.या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा विषय अग्रभागी होता.महिलांचे आरोग्य,सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.'जिच्या हाती ज्ञानाची आणि कर्तृत्वाची दोरी,तीच घडवे नवी सृष्टी भारी'हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.एकंदरीतच,महिला दिनाचा दिवस केवळ शुभेच्छांचा दिवस न ठरता,स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ठरला.या प्रसंगी महिलानी उत्स्फूर्त पणे प्रश्न विचारले.उत्तरे जाणून घेतल्यानंतर प्रतिक्रिया आणि चर्चा करून समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर,स्नेहल काळे,अपूर...

अग्निवीरांच्या पुनर्वसनाबाबत शासनाकडे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय - मंत्री शंभूराज देसाई

इमेज
मुंबई, दि. ०६ :-  अग्निवीर योजनेतंर्गत सेवा पूर्ण करून परतणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल ७ एप्रिलपूर्वी शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य चंद्रदीप नरके यांनी अग्निवीर जवानांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.मंत्री देसाई म्हणाले की,भारतीय सशस्त्र दलामध्ये अग्निवीरांची नियुक्ती चार वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते.महाराष्ट्रातून २०२२ ते २०२४ या कालावधीत सुमारे ११ हजार अग्निवीर सैन्यदलात समाविष्ट झाले आहेत. यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे २,७५० जणांना पुढे सैन्य सेवेत संधी मिळू शकते,तर उर्वरित सुमारे ८,२५० अग्निवीर चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नागरिक जीवनात परतणार आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अभ्यासगट स्थापन केला असून त्याला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.हा कालावधी ७ एप्रिलला संपत असून त्यापूर्वी समितीचा अहवाल शासनाकडे सादर होईल, असेही त्यांनी सांगितले.अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यातील विविध ...

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार - मंत्री दादाजी भुसे

इमेज
मुंबई, दि. ०६:-  राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी शासनाचे स्पष्ट धोरण असून शाळा स्तरावर परिवहन समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा बस सुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तसेच शालेय वाहतूक नियमांची तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे खासगी शाळेच्या व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनेबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.या चर्चेत सदस्य अभिमन्यू पवार, विठ्ठल लंघे, नाना पटोले, संजय मेश्राम या सदस्यांनीही सहभाग घेतला. मंत्री भुसे म्हणाले, ७ जुलै, २०२५ रोजी अंबरनाथ येथील एका खासगी इंग्रजी शाळेच्या व्हॅनमधून काही विद्यार्थी प्रवास करत असताना दोन विद्यार्थी खाली पडून जखमी झाले.हे वाहन संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी खासगीरित्या लावलेले होते. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुसऱ्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांची पडताळणी,बसम...

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार - मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
मुंबई, दि. ०६ :- महाविद्यालयांमध्ये विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पावले उचलली असून, शुल्क नियामक प्राधिकरणाकडून आता ट्युशन फीबरोबरच इतर शुल्कांवरही नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.भुसावळ (जि. जळगाव) येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून जादा शुल्क आकारल्याबाबत विधानसभा सदस्य अस्लम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.मंत्री पाटील यांनी सांगितले की,विद्यापीठाने चौकशी करून भुसावळ (जि. जळगाव) येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयाकडून वसुल केलेली अतिरिक्त रक्कम परत घेतली असून त्यावर दंडही आकारण्यात आला आहे.हा दंड विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.काही महाविद्यालयांकडून पॉवर चार्जिंग, कॉम्प्युटर लॅब आदी नावाने शुल्क आकारले जात असल्याची बाब चौकशीत समोर आली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शुल्कांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.आर्ट्स, सायन्स व क...