पोस्ट्स

दैनिक सनातन प्रभातचा वर्धापन दिनी साजरा

इमेज
वाचक,हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा अविष्कार !  ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे ! - श्री. दुर्गेश परूळकर, व्याख्याते  नाशिक :- समाजाची धारणा,राष्ट्राचे स्थैर्य आणि स्वातंत्र्य हे केवळ राजसत्तेवर अवलंबून नाही,तर संस्कारांवर अवलंबून आहे.संस्कार विस्कळीत अथवा नाहीसे झाले,तर समाज भरकटत जाईल हे संतांनी ओळखले.त्यामुळे त्यांनी समाजात सुसंस्कारांचे बीज पेरले.त्याला उच्च नैतिकतेचे खतपाणी घातले.सांस्कृतिक अभंगता हे आपल्या देशाचे बळ आहे,सामर्थ्य आहे.ही अभंगता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे.तरी संस्कृती आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेले व्रतस्थ धर्म रक्षकच राष्ट्राचे खरे वीर आहेत.त्यामुळे‘व्रतस्थ धर्मरक्षक’हे दोन शब्द दैनिक‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे,असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत दुर्गेश परुळकर,यांनी यावेळी काढले.२२ फेब्रुवारीला शंकराचार्य न्यास संकुल,डॉ.कु...

गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची - राजेश गाडगीळ

इमेज
नाशिक :- गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.अपघात कमी करण्या साठी जागरूकता आणि योग्य प्रशिक्षण खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ञ राजेश गाडगीळ,यांनी केले.सातपूर येथील नॅब सभागृहात नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देणाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी राजेश गाडगीळ,बोलत होते ते म्हणाले की गिर्यारोहकांना पर्वतांच्या भौगोलिक परिस्थिती,हवामान,आणि शारीरिक शक्ती याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.अर्धवट माहितीच्या जोरावर चुकीच्या आत्मविश्वासामुळे सध्या गिर्यारोहण क्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढले प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृती करणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन केले.संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देऊन सहकार्य केलेले प्रमुख अतिथी नंदू चव्हाण, भगवान चवले,भरत वखारिया,संजय अमृतकर आदींचा संस्थेच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त  करून चर्चासत्रा प्रसंगी उपस्थितांच्या  शंकांचे निरसन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितितां मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता ऋतिक मारणे,याचा सत्कार करण्यात आला या चर्चासत्राचे सूत्रसंचालन तेज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

इमेज
नवी दिल्ली, दि. २० :-  नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले.तसेच विविध मान्यवरांच्या भेटी,बैठकांमध्ये सहभागी होत  सामंजस्य करार केले.याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले.   अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी! ओपन एआयचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अझीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. ओपन एआय आणि रॉकेट लर्निंगशी भागिदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याचा लाखो अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे. भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्य...

कळवण मर्चंट बँकेच्या वतीने सभासदांना ट्रॅव्हल्स बॅग वाटप शुभारंभ

इमेज
कळवण :- कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेली,प्रगतीची संजीवनी हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारी दि.कळवण मर्चंट बँके मार्फत सभासदांसाठी ट्रॅव्हल्स बॅग वाटपाचा शुभारंभ गुरुमाऊली आणासाहेब मोरे,यांच्या शुभहस्ते कळवण लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक लायन क्लब इंटरनॅशनल चे अध्यक्ष राजेश कोठावदे होते.प्रमुख अतिथी म्हणून मुकुंद कुलकर्णी,नाशिक, नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक,नामको बँकेचे संचालक अशोक सोनजे,गिरीश महाजन नाशिक महापालिका नगरसेवक भूषण राणे, महेश पितृभक्त,शाम महाजन,रमेश मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.कमको बँकेचे संचालक व नेते गजानन सोनजे,नेते संजय मालपुरे चेअरमन भारती कोठावदे,व्हा चेअरमन लक्ष्मण खैरनार, जनसंपर्क संचालक रंगनाथ देवघरे,प्रवीण संचेती योगेश महाजन,दिपक वेढणे,नितीन वालखेडे,सागर शिरोरे,शालिनी महाजन, सुभाष शिरोडे,धनंजय अमृतकर,विनोद मालपुरे,डॉ धर्मराज मुर्तडक,सतीश कोठावदे पोपट बहिरम, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजन मालपुरे,तज्ञ संचालक गलिब मिर्झा,भूषण कोटकर,शाखा व्यवस्थापक कैलास जाधव,व सर्व कर्मचारी आदींनी कार्यक...

गिरणा आरोप प्रकरणी उबाठा सेनेचे खा संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली

इमेज
गिरणा साखर कारखान्यातील शेअर होल्डर्स, शेतकरी बांधव तसेच सर्व मालेगावच्या जनतेची संजय राऊत यांनी मागितली माफी.! मालेगाव :- दैनिक सामना मध्ये खा. संजय राऊत यांच्या माध्यमातून गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.या बातमीमुळे मालेगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला.याबाबत  आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,हा आरोप पूर्णपणे निराधार व चुकीच्या माहितीतून करण्यात आला होता.एकेकाळी सहकारातून उभा राहिलेला गिरणा सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेत असताना,तो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा या उद्देशाने सुमारे ११ हजार सभासद शेतकरी एकत्र आले होते.प्रति शेअर ११०० रुपये उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सर्वपक्षीय लोकांनीही या प्रयत्नाला साथ दिली.काही कारणांमुळे अपेक्षित भागभांडवल पूर्णपणे उभे राहू शकले नाही; मात्र जेवढी १.७८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली,ती अधिकृत पद्धतीने आरटीजीएसद्वारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली.हा सर्व व्यवहार नोंदीनुसार आणि कायदेशीर मार्गाने झालेला होता.यावेळी स्पष्...

पांडवनगरी येथे छत्रपती शिवरायांची जयंती जल्लोषात साजरी

इमेज
नाशिक :- इंदिरानगर पांडव नगरी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितांनी शिवप्रतिमेचे पुजन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला कार्यक्रमाचे आयोजन पोपट डावरे,सुनील गांगुर्डे,संजय राव,भगवान भदर्गे,गणेश पवार,जितेंद्र सावंत,भूषण जगताप,बाबा डोंगरे,पंढरी सूर्यवंशी,संजय गांगुर्डे,दिगंबर राठोड,योगेश सूर्यवंशी,विकी पगारे,मयूर गायकवाड,राहुल चव्हाण,प्रणव मोरे,यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र सचिव एकनाथ मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस योगेश दिवे,यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कल्पना शिंदे,विमल गावंडे, विमल डावरे,विमल पवार,इंदुताई गांगुर्डे,शालिनी दिवे,कविता सैंदाणे,छाया ठाकूर,अनुष्का चव्हाण, योगिता शिरसाट,रसिका सावंत,सविता सूर्यवंशी, नामदेव जोगदंड,गजानन वानखडे,यशवंत शिरसाट,इत्यादी व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकल मराठा परिवाराकडून वृक्षलागवड करून शिवजन्मोत्सव साजरा

इमेज
नाशिक :- पत्रकार सकल मराठा परिवाराच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून आगळीवेगळी शिवजयंती मनपा शाळा क्रमांक ४९,पंचक. या ठिकाणी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे गडकोट आणि निसर्गाचे जतन केले,त्याच प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी,भविष्यातील पिढीने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी,या उद्देशाने प्रत्येक रोप हे शिवप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून लावण्यात आले.वृक्षारोपण हीच खरी शिवसेवा समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही शिवजयंती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल.या उपक्रमासाठी आपलेत पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी त्यांनी वृक्षारोपण कसे करावे याविषयी तसेच झाडांच्या विविध प्रजाती विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.तसेच मोलाचे सहकार्य ऍड.सुनील आण्णा बोराडे,शालेय समिती अध्यक्ष,केंद्रप्रमुख गोपाल बैरागी सर,योगेश निसाळ,मुख्याध्यापिका विमल रायते,(ढिकले...