‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती, दि.१३ :- जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन या गावातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव,माळेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते,उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड,तहसीलदार स्वप्नील रावडे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के,आयडीबीआयचे मुख्य व्यवस्थापक आशुतोष कुमार,फोरमचे सदस्य आदी उपस्थित होते.श्रीमती पवार म्हणाल्या,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया-बारामतीच्या माध्यमातून मागील ...