अक्कलकोट पालखी व पादुका परिक्रमेचे रविवार दि. ११ रोजी चेतनानगर येथे आगमन

नाशिक इंदिरानगर :- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट पालखी व पादुका परिक्रमेचे रविवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता कैवल्य अपार्टमेंट, इच्छापूर्ती चौक,चेतनानगर, राणेनगर येथे आगमन होणार आहे. 
राणेनगर ते कैवल्य अपार्टमेंट येथे सकाळी १० आगमन व पालखी मिरवणूक त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती होऊन दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल,सायंकाळी श्रीक्षेत्र दत्तधाम नाशिक येथील प.पू.श्री दत्तदास महाराज यांचे आगमन त्यानंतर पाच ते सात वाजेपर्यंत कीर्तन व भजनाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. स्वामी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विनोद पुरुषोत्तम कुलकर्णी, या सेवेकर्‍यांनी यांनी केले आहे.तसेच सदर पालखी दि.12.रोजी इंदिरा नगर महिला बँकेजवळ माजी नगरसेविका नागरे,यांचे कडे सकाळी 10 वाजता तेथून पुढे मुंबई नाका भाभा नगर येथे कुक्कर, यांचे निवासस्थानी आगमन होणार आहे. त्याठिकाणी दुपारच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला