केटीएचएम महाविद्यालयाचा बारावीचा 87 टक्के निकाल


विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८७ टक्के लागला असून, विज्ञान शाखेचा निकाल ९८.५४ टक्के कला शाखेचा ६९.८९ तर वाणिज्य शाखेचा ९१. ९३ टक्के लागला.
विज्ञान शाखेची रिया कैलास वाघ ही विद्यार्थिनी 85.83 टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेतून सार्थक राजेंद्र मांडगे हा विद्यार्थी 91 .17 टक्के मिळवून प्रथम तर कला शाखेतून सोहम बापूसाहेब साळुंके हा विद्यार्थी 91.67 टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. धनश्री विक्रम शिंदे या विद्यार्थिनीने अकाउंट विषयात तर, राजश्री ज्ञानेश्वर चव्हाण आणि सप्तमी संजय आंबेकर या दोन विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.
सर्व शाखांमधील पहिल्या आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मविप्र पदाधिकारी व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सेवक संचालक डॉ संजय शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. के. एस. शिंदे, डॉ. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्यासह शाखाप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

शाखानिहाय पहिले पाच विद्यार्थी
विज्ञान- रिया कैलास वाघ (85.83), कृष्णा अरविंद पाटील (85.50), सिद्धांत अनिल सुरवाडे (85.17),अनिकेत बाळू शेळके (84.33), श्रावणी राजाराम संधान (84.00)

वाणिज्य- सार्थक राजेंद्र मांडगे (91.17), स्नेहा विठ्ठल शेरे (90.83), अजिजूर अब्दुररहमान शेख (90.50), अपूर्वा अमोल पवार (88.33), गौरी गणेश खराटे (87.33)

कला - सोहम बापूसाहेब साळुंके (91.67) मोहित अशोक पाटील( 88.16), आकाश भगवान गायकवाड(86) , वैशाली मोहन ससे(82.33), तनुजा विष्णू वाघ (77.83) 


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला