Posts

Showing posts from May, 2025

माता अहिल्याबाई या राष्ट्रनिर्मितीमधील आपल्या महिला शक्तीच्या अमूल्य योगदानाचे प्रतीक आहेतः पंतप्रधान

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनाला केले संबोधित भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन आणि पायाभरणी लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे नाव आपल्यामध्ये आदराची भावना निर्माण करते, त्यांच्या महान व्यक्तिमत्वाविषयी बोलायला शब्द अपुरे देवी अहिल्याबाई या भारताच्या वारशाच्या महान संरक्षक होत्याः पंतप्रधान आमचे सरकार महिला प्रणीत विकासाच्या दृष्टीकोनाला विकासाचा आस बनवत आहेः पंतप्रधान नमो ड्रोन दीदी अभियान ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देत आहे, त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहेः पंतप्रधान आज, आपल्या प्रमुख अंतराळ मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने महिला शास्त्रज्ञ काम करत आहेतः पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर देखील महिला शक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे- पंतप्रधान   लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी ...

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न व पोषणविषयक विशेष प्रयोग करणार - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घोषणा

Image
भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आगामी `अ‍ॅक्सिअम मिशन 4` (एएक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अन्न आणि पोषणविषयक विशेष प्रयोग करतील, अशी माहिती, अंतराळ विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हे प्रयोग भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहेत. नासाच्या (एनएएसए) पाठबळासह हे प्रयोग विकसित करण्यात आले असून, अंतराळातील पोषणशास्त्र आणि दीर्घकालीन मानवी मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या स्वयंपूर्ण जीवन समर्थन प्रणालींच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की `अ‍ॅक्सिअम-4` मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे `मिशन पायलट` म्हणून काम पाहतील. त्यांच्या सोबत `मिशन कमांडर` म्हणून पेगी व्हिटसन (यूएसए, एनएएसएचे माजी अंतराळवीर), तसेच `मिशन स्पेशालिस्ट` म्हणून स्लावोश उज्नान्स्की-विश्न्येफ्स्की (पोलंण्ड/इएसए) आणि टिबोर कापू (हंगेरी/इएसए) सहभागी असतील. ग्रुप कॅप्टन शुक्ला हे मानवी अंतराळ मोहिमेसाठी प्...

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Image
नवी दिल्ली, दि. ३१ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पु...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्याकल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न अहिल्यानगर, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी 28 वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ...

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय

Image
मुंबई,दि. ३१: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्य...

पहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

Image
मुंबई, दि. 31: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

लग्नातील अवाजवी खर्चाला देऊ फाटा - ॲड. नितीन ठाकरे

Image
लग्नातील अवाजवी खर्चाला देऊ फाटा- ॲड. नितीन ठाकरे हुंदापद्ध्ती विरोधात विविध सामाजिक संघटनांची वज्रमुठ नाशिक :- महाराष्ट्राला हेलावून टाकणाऱ्या महिन्याभरातील हुंडाबळीच्या घटनांमुळे समाजातील या दुष्ट चालीरीती आणी त्यावरील उपायांबाबत विचारमंथन करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, मराठा महासंघ नाशिक शाखा, यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेला संबोधित करतांना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्त्री विषयक सन्मानाच्या संस्कारातून हा महाराष्ट्र निर्माण झाला, आद्य समाजसुधारकांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या जाणीवेतून आणि कार्यातून महाराष्ट्र घडला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात थोर विभूतींनी आपल्या कार्यातून, हुंदापद्ध्ती, सतीप्रथा आणि यासारख्या वाईट चालीरीती ज्या त्याकाळातील समाजात परंपरा म्हणून स्वीकारलेल्या होत्या त्याविरुद्ध आयुष्यभर झिजून आजचा सुसंस्कृत म्हंटला जाणारा महाराष्ट्र आ...

संभाजी ब्रिगडच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन

Image
विडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करावे  अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सी बी एस अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या(300 व्या) त्रिशत्कोत्तर जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सी बी एस येथे कॉलेजच्या तरुणी महिला आघाडी व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुशल उत्तम प्रशासक विधवा स्त्री असून देखील अत्यंत धैर्याने स्वराज्याचा विचार जपण्यासाठी गोर गरिबांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावणाऱ्या व बुद्धीमत्ता स्वतःची माक्तेदारी समजणाऱ्या नराधमांना वठणीस आणणाऱ्या लोकमाता राष्ट्रामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी शाहीर संविधान गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे हिरामण वाघ, जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई टुपके जेऊघाले,उपजिल्हाप्रमुख विकी गायधणी, नितीन काळे, निलेश गायकवाड,महेंद्र बेहेरे, अनिल ननावरे,गणेश पाटील,प्रेम भालेराव, संविधान गायकवाड,ल...

किमान 10 वर्षांची ग्राह्य सेवा केलेल्या केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त एनपीएस सदस्यांना एकीकृत पेन्शन योजने (यूपीएस) अंतर्गत अतिरिक्त लाभासाठी दावा करण्याची मुभा

Image
यूपीएसअंतर्गत मिळणारे लाभ आधी दावा केलेल्या एनपीएसच्या फायद्यांव्यतिरिक्त असतील   दिल्ली: 30 मे 2025 केंद्र सरकारच्या एमपीएसचे जे सदस्य 31/03/2025 रोजी किंवा त्यापूर्वी किमान 10 वर्षांच्या लाभास पात्र सेवा कालावधीनंतर निवृत्त झाले असतील किंवा त्यांच्या कायद्याने विवाहित जोडीदाराला एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) अंतर्गत, एनपीएस अंतर्गत आधीच दावा केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त आणि त्याहून अधिक लाभांसाठी दावा करता येईल: लाभासाठी ग्राह्य मानला जाणारा सेवा कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक सहा महिन्यांसाठी निवृत्त होण्यावेळच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या एक दशांश रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता एकरकमी (एकाच हप्त्यात) मिळू शकेल. मासिक टॉप-अप रकमेचा हिशोब स्वीकार्य युपीएस पेआउट + डीअरनेस रिलीफ (DR) वजा NPS अंतर्गत मिळणारी प्रातिनिधिक वार्षिक रक्कम असा केला जातो लागू असलेल्या पीपीएफ दरांनुसार सरळ व्याजासह थकबाकी. यूपीएसच्या लाभांसाठी पुढील मार्गांनी दावा केला जाऊ शकतो: भौतिक पद्धत - DDO ला भेट देऊन आणि अर्ज सादर करून (B2- सदस्यांसाठी आणि B4/B6 - कायदेशीररित्या विवाह केलेल्या जोडीदारासाठ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

Image
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांचे आणि ‘मेक इन इंडिया’चे सामर्थ्य जगाने अनुभवले : पंतप्रधान महानगरांमध्ये मिळणा-या पायाभूत सुविधा आणि संसाधने आता कानपूरमध्येही उपलब्‍ध : पंतप्रधान उत्तर प्रदेशला आम्ही औद्योगिक संधींचे राज्य बनवत आहोत: पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे 24 एप्रिल 2025 रोजीचा पूर्वनियोजित कानपूरचा दौरा रद्द करावा लागला होता. या अमानुष कृत्याचे बळी ठरलेले कानपूरचे सुपुत्र शुभम द्विवेदी यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशभरातील भगिनी आणि कन्यांच्या वेदना, दुःख, राग आणि सामूहिक रोष यांनी आपण अंतर्मुख झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच, हा सामूहिक रोष जगभरात उमटला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्याला संघर्ष संपवण्याची विनंती करण्यास भाग पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांनी अधोरेखि...

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य - कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

Image
प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद छत्रपती संभाजीनगर, दि.३०:- शेती हा व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर व्हावा. कृषी विभागाचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांना मदत करणारे व हिताचे व्हावे. यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सुचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केले. कृषी विभागाच्या वतीने प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजीत करण्यात आला होता. जालना रोडवरील शिवनेरी लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते.विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर व लातूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ॲड. कोकाटे हे होते. आ. अनुराधा चव्हाण, कृषी आयुक्त सुरज मांढरे, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, संचालक आत्मा अशोक किरनळ्ळी , विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख तसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच शेतकरी म...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Image
नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अमरावती, दि. 30 :- जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्‍यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या बाबत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन या बाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करावा, याचा निधी प्राप्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बाधितांना तातडीने नुकसान भरपाई व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांना व जिल्हाधिकारी यांना दिले आहे. एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 174 बाधित गावामधील 794 हेक्टर केळी, संत्रा, पपई, कांदा आणि गहू शेतीचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 2 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मे मध्ये 32...

औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून कुशल मुनष्यबळाची निर्मिती व्हावी - मंत्री मंगलप्रभात लोढा

Image
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ‘इंडस्ट्रीयल मिट’ संपन्न        नाशिक, दि. 30 मे, 2025 :-  औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जावाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले आहे. औद्योगिक आस्थापनांनी खाजगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन कौशल्य विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज शहरातील निमा हाऊस, सातपूर येथे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिट’मध्ये मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य चे सचंलालक सतीश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित, निमा सचिव राजेंद्र अहिरे, कौशल्य विकासचे प्र. उपायुक्त श्री. रिसे, उपसंचालक आर एस मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री श...

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

Image
मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनी...

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

Image
तंबाखूसेवनाने विविध आजारांना निमंत्रण: राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम मुंबई, दि. ३०: जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळामार्फत राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करत लोकांना नशा मुक्त जीवन जगण्याचे आवाहन या उपक्रमात करण्यात आले. याचे उद्घाटन आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मुंबईतील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सखोल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्सच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, ‘मॅजिक जार’ संकल्पना, तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा यांसारखे उपक्रम यावेळी राबविण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, तंबाखूमुळे केवळ कर्करोग होण्याची शक्यता वाढत नाही तर मेंदूच्य...

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

Image
नवी दिल्ली , दि. ३० :  जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात गेली 18 वर्षे अत्यंत निष्ठा, कष्ट व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले...

राज्य, धर्म व भाषेपेक्षा मातृभूमीचा अधिक अभिमान बाळगावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Image
राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल राज्यपालांकडून स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मुंबई, दि. ३०: गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपल्या राज्याचा, धर्माचा व आपल्या भाषेचा अभिमान अवश्य बाळगावा परंतु, सर्वाधिक अभिमान मातृभूमीचा बाळगला पाहिजे, असे सांगितले. राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा राज्य स्थापना दिवस (30 मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (2 जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. दोन्ही राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले. गोवा राज्य स्थापना दिनाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (स्वारातीम) यांच्या सहकार्याने केले होते, त...

आयईपीएफए आणि सेबी गुंतवणूकदारांना सक्षम बनवण्यासाठी तसेच तक्रार निवारण आणि दावा न केलेले लाभांश दावे सुव्यवस्थित करण्यासाठी पुण्यात पथदर्शी ‘निवेशक शिबिर’ सुरू करणार

Image
निवेशक शिबिर गुंतवणूकदार, कंपन्या आणि आरटीए यांच्यात थेट संवाद घडवून आणून मध्यस्थांना दूर ठेवेल , समर्पित कियॉस्कद्वारे त्वरित तक्रार निवारण सुविधा प्रदान करेल आयईपीएफए सहा ते सात वर्षांपासून दावा न केलेल्या लाभांशाची थेट वसुली सुलभ करेल नवी दिल्ली, 29 मे 2025 केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (आयईपीएफए) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) च्या सहकार्याने 'निवेशक (गुंतवणूकदार) शिबिर' या त्यांच्या पथदर्शी उपक्रमाची घोषणा केली आहे. पहिले शिबीर 1, जून 2025 रोजी पुणे येथे सकाळी 10:00 ते सायंकाळी 4:00 या वेळेत होईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांचे दावा न केलेले लाभांश आणि समभाग संबंधित समस्या सोडवण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करणे आणि गुंतवणूकदार सेवांमध्ये थेट प्रवेश प्रदान करणे हा आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आयईपीएफएचे खालील सुविधा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे : सहा ते सात वर्षांपासून दावा न केलेल्या लाभांशांसाठी थेट सुविधा केवायसी आणि नामांकनाचे तात्काळ अद्यतन...

गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत अभिनव उपक्रम अंगणवाड्यांचे ई-लर्निंग सुविधांसह अद्ययावतीकरण गडचिरोली जिल्हा परिषद आणि वेदांत ग्रुप यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे. या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण साहाय्य दिले जाईल. तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबविण्यात येत आहे. हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे ‘नंदघर’मध्ये रूपांतर केले जाईल. या प्रकल्पानुसार ‘नं...

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता

Image
मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट उर्वरित १३ प्रकल्पांनाही लवकरात लवकर मंजुरीचे आश्वासन नवी दिल्ली, दि. २९: महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित १३ प्रकल्प तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील प्रलंबित विकास परवानगींना तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री यादव यांनी देखील मंत्री राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित परवानगी तसेच विविध विकास क...