Posts

Showing posts from July, 2025

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रज्ञा सातव, आयुक्त नयना गुंडे, सहायुक्त राहुल मोरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे. मुलींचा शैक्षणिक दर्जा, कौशल्यविकास आणि जीवनमूल्ये वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. बालगृहास प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच लोकप्रतिनिधी आणि विभागामध्ये चर्चा करून यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बालगृहातील मुलींच्या समस्या समजून घेण्यासाठी व...

प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते दरसवाडी धरणातून दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी

Image
विडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करावी येवला,दि.३१ जुलै :- मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आज दरसवाडी धरण ओव्हर फ्लो झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्याचे चाक फिरवून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी सोडण्यात आहे. या मांजरपाडाच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहे. या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या येवला लासलगाव मतदारसंघा बरोबरच चांदवड, आणि मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच येवला मतदारसंघात खळाळनार आहे.मांजरपाडा प्रकल्पाच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाची बरसात झाल्याने पुणेगाव मार्गे दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून या प्रकल्पाचे जनक मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते जलपूजन केल्यानंतर चाक फिरवून हे पाणी येवल्याकडे मार्गस्थ करण्यात आले .याव...

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून पंधरा दिवसाच्या आत कामाला सुरवात करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला तत्काळ सुरवात करा - मंत्री छगन भुजबळ,फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक मुंबई,दि.30जुलै 2025:-(समाधान शिरसाठ)अनेक दिवस प्रलंबित असलेला फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती देणे आवश्यक असून येथे पंधरा दिवसात या कामाची तात्काळ अंमलबजावणी होऊन भूसंपादन पार पडले पाहिजे असे मत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आज पुण्यातील गंज पेठ येथील फुले दांपत्याचे निवासस्थान असलेले "फुले वाडा" आणि त्या जवळच असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या विस्तारीकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात याबाबत बैठक पार पडली. याबैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत रासने, माजी खासदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ व...

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा

Image
छत्रपती संभाजीनगर, दि.29 :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते. निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून, 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोईसुविधांचा आढावा घेऊन सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयु...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
प्रसिद्धी प्रमुख न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब,लाईक शेअर करा.बघण्यासाठी क्लिक करावे स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 – प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय...

आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
मुंबई, दि. 29 : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने वित्त विभागाकडे सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार भीमराव केराम, नितीन पवार, आमश्या पाडवी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री  पवार म्हणाले की, अर्थसंकल्पात एकूण रकमेच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमातींना निधीचे वितरण निकषा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
राज्य शासनातर्फे करण्यात येणार सन्मान नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून ‘ग्रँड मास्टर’ हा  किताब मिळविला आहे, त्यांची ही  कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिव्या देशमुख यांनी भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांना जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करून ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन करत दिव्या देशमुख यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेत यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले. दिव्या देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत २३ सुवर्ण पदकांसह जवळपास ३५ पदके पटकावली आहेत. दिव्या देशमुख यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्य...

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू - क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

Image
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. न्यु मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित क्रीडा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाहक प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाहक प्रा. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामाकांत देशमुख, न्यु मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ.विक्रम फाले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.आयुष्यात यश मिळविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून ध्येयाने प्रेरित होत वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले, नेहमी धाडस करून नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासा...

वाघ… केवळ शिकारी नव्हे, तर जैवशृंखलेचा श्वास!

Image
भारतीय संस्कृतीत वाघ हे केवळ वन्य प्राणी नाही, तर सामर्थ्य, शौर्य आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक मानले गेले आहे. देवी दुर्गेच्या वाहनापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफांवरील कोरीव वाघापर्यंत याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. याच वाघाच्या संवर्धनासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो – एक दिवस केवळ प्राण्यांसाठी नाही, तर आपल्याच संवेदना जागवणारा. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असला, तरी त्याचे अस्तित्व म्हणजे संपूर्ण जैवविविधतेचे आरोग्य. एक वाघ सुमारे ५० ते १०० चौ.किमी परिसर व्यापतो आणि त्या अधिवासातील अनेक प्रजाती, झाडे, जलस्रोत यांचे संरक्षणही नकळत घडते. म्हणूनच म्हटले जाते – वाघ वाचला, तर जंगल वाचेल आणि जंगल वाचले, तर माणसाचे आयुष्यही सुरक्षित राहील. एकेकाळी भारतात ४० हजार वाघ होते, परंतु अविचारी शिकारी व जंगलतोडीमुळे १९७२ पर्यंत केवळ १,४०० इतकी संख्या उरली. या घटलेल्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ‘प्रोजेक्ट टायगर’ ही ऐतिहासिक मोहीम सुरू झाली आणि आज भारतात पुन्हा ३,१६७ वाघ अस्तित्वात आहेत – जगातील सर्वाधिक! महाराष्ट्रातील वाघ संवर्धनात जळगाव जि...

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

Image
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा शिरसवडी येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या 7 वर्ग खोल्यांचे व पळशी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा येथील 9 खोल्यांचे भूमिपूजन मंत्री गोरे, यांच्या हस्ते झाले. या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, गटविकास अधिकारी योगेश कदम, अंकुश गोरे,गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते, अनिल माने,भरत जाधव, बंडा गोडसे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिरसवडी व पळशी येथील शाळेच्या नवीन खोल्यांचे बांधकाम चांगल्या पद्धतीने व वेळेवर करावे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, जिल्हा परिषदेत शाळेतील शिक्षकांनी शाळेतील पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. शाळांना सर्व सुविधा शासनामार्फत दिल्या जातील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण दिले जाते याबाबत नागरिकांचा विश्...

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Image
मुंबई, दि. २८ : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली आवेदने ३१ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7 या लिंकवर ऑनलाईन सादर करावीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

Image
अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता मुंबई, दि. २६ :- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी  छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी  ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार,नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेत...

शिक्षक प्रदीप सिंग पाटील यांचा पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मान

Image
पुणे :- भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट फिरोदिया सभागृह पुणे येथे एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या वतीने पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण जीवनगौरव, पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी येथील उपशिक्षक प्रदीप सिंग पाटील, यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व पर्यावरणातील योगदानाबद्दल पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ जी डी यादव तसेच एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोल घमंडे, सचिव गणेश शिरोडे, खजिनदार सचिन पाटील, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, यांच्या हस्ते पाटील यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह अनेक काॅंग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

Image
चांदवड :- नाशिक येथील कार्यालयात चांदवड तालुक्यातील उसवाडचे सरपंच संजय पवार,यांच्यासह उपसरपंच, सहा सदस्य व बहुसंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत करत पक्षाचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत त्यांनी जनतेच्या सेवेसाठी एकजूटीनं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, चांदवड तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, निफाड पूर्वच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, डॉ.वैशाली पवार, उसवाडचे उपसरपंच रवींद्र बीडगर, सदस्य भारत आहिरे, जिभाऊ बटाव, मोठाभाऊ शिंदे, यांच्यासह प्रवेशकर्ते पदाधिकारी नामदेव बिडगर, भीमराव पवार, अशोक गायकवाड, वाल्मिक शिंदे, सोमनाथ बिडगर, अण्णा पवार, एकनाथ पवार, पुंडलिक पवार, त्र्यंबक शिंदे, अनिल बिडगर, संजय बिडगर, भाऊसाहेब पवार, संतोष पवार, सुन...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू

Image
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. या निवडणुकीसाठी “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम, १९५२” आणि त्याखालील “नियम, १९७४” लागू होतात. या अधिनियमाच्या कलम ३ नुसार, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतो, ज्यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे असते. याशिवाय, एक किंवा अधिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त केले जाऊ शकतात. परंपरेनुसार, लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयाचे महासचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आलटून पालटून नियुक्त केले जातात. मागील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्याअनुषंगाने, आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभा सचिवालयाचे महासचिव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कायदा व न्याय मंत...

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन नवी दिल्ली, दि. २४ :- भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृ...

किशोर झोटिंग यांचा सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे सत्कार

Image
नाशिक :- जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना गुरुजन सन्मान देऊन गौरवण्यात आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी नाशिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येऊन त्यांची नाशिक शहर मुख्याध्यापक संघाच्या सदस्य पदि देखील निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तसेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.संजय चावला ,डॉ.चेतन जोशी , डॉ.अशिष गायकवाड उपस्थित होते.

शिव दुर्गप्रेमी प्रेमी सकल मराठा परीवार संस्थेचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान

Image
नाशिक :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर दुर्गाला युनेस्कोचे 'मराठा मिलिटरी लँडस्केप'अंतर्गत जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रक्रियेत छत्रपतींचा एक मावळा म्हणून सकल मराठा परीवार संस्थेने तसेच समन्वयक खंडू आहेर,यांनी दाखविलेली सजगता,आपल्या वारसास्थळाबद्दलची आपुलकी आणि हा वारसा जपण्याची तळमळ याशिवाय हे यश शक्य नव्हते.या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी, तसेच दुर्ग संवर्धनात सकल मराठा संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांनी एक विशेष परिसंवाद व सन्मान समारंभ आयोजित केला होता.आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनातील सक्रिय सहभागामुळे, तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे एक ऐतिहासिक यश आपल्या सर्वांसमोर उभे आहे. किल्ल्यासह महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ल्यांना आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याला युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप' अंतर्गत जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केला आहे. मराठा साम्राज्याचा वारसा जपण्यासाठी संस्थेने...

आसाम येथील १५ वर्षाच्या हिंदू अल्पवयीन मुलीस पळून नेणाऱ्या २० वर्षाच्या युवकास अटक

Image
ना.रोड :- शामलू परमेश्वर शाह, राहणार तिनसुकीया तालुका जिल्हा तिनसुकिया राज्य आसाम यांनी त्यांची १५ वर्षांची भाची नाव अनामिका हि दि.१६/०७/२०२५ पासून पहाटे ४:०० वाजता बेपत्ता होती. तक्रारदाराला संशय होता की, समीर अली नावाच्या इसमाने त्यांची भाचीला फूस लावून पळून नेले.त्यानुसार, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिनसुकिया पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२५ कलम ८७ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.होता तपासादरम्यान असाम येथील पोलीसांना समजले की आरोपीत पीडित मुलगी ही महाराष्ट्र मुंबईच्या दिशेने ट्रेन प्रवास करत आहे.याबाबत आसाम येथील पोलिसांनी दि. १८/०७/२०२५ रोजी रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड व रेल्वे पोलीस नाशिक रोड यांना सदर गुन्ह्याची माहिती देऊन पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपी पकडण्याबाबत सांगितले असता रेल्वे स्टेशनला पोलीसांनी मुंबई ला जाणारी दिब्रुगड रेल्वे गाडीत शोध घेतला असता पीडित मुलगी मिळून आली तिला नाशिक उंटवाडी येथील मुलींचे निरीक्षण गृह मध्ये दाखल करण्यात आले. तिला आसाम पोलीस यांनी समक्ष विचारपूस केली असता आरोपीत समीर अली, हा‌ मुंबई येथे तिला पळवून घेऊन जात असल्याचे सांग...

पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा-पालकमंत्री नितेश राणे

Image
Get Sarees & More Under Rs 249 Only on Shopsy!*Shop Now!* दुरूस्तीसाठी महावितरण विभागाला निधी देणार • तात्काळ खड्डे बुजवा • मोबाईल सेवेला प्राधान्य द्या • बस फेऱ्या वाढवून प्रवाशांना सुविधा द्या सिंधुदुर्गनगरी दि.२१ :- गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. सणासुदीच्या दिवसांत वीजपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्या. बीएसएनएल विभागाने कव्हरेज संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. या दिवसांत बाहेर जिल्ह्यातून बसने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक राहणार असल्याने परीवहन विभागाने तसे नियोजन करावे. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सर्व यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल प...

द्वारका सर्कलवरील अंडरपासबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

Image
नाशिक,दि.२१:- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)नाशिक शहरातील द्वारका चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने अंडरपासची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारका सर्कल येथे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत याठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या अंडरपासची माहिती घेत याठिकाणी करावायच्या विविध उपाययोजनांबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख,पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक महानगरपालिका वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, आकाश पगार,पांडुरंग राऊत,अमर वझरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. द्वारका सर्कल नाशिकहून नाशिकरोड कडे जाताना ८०० मीटरचा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हलकी वाहने ये जा करू शकणार...

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

Image
‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे मुंबई,दि. 19 :- राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसुली विभागातील ३४ जिल्ह्यात एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारत बांधण्याकरिता २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार तर दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृह साठी २५ कोटी १७ लाख २० हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक यो...

वाढदिवसाच्या अवास्तव खर्चाला फाटा निराधारांना दिलासा,ॲड.साहिल ठाकरे यांच्या हस्ते आरोग्य किट वाटप

Image
ॲड. साहिल ठाकरे यांनी केअर सेंटरमध्ये वाटप केले आरोग्य किट नाशिक  :-  हल्ली वाढदिवस म्हटला कि, शुभेच्छा संदेश देणारे मोठमोठे फलक चौकाचौकांत पहायला मिळतात. अलिशान हॉटेल, फार्महाउसमध्ये जंगी पार्ट्या करून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले जाते. परंतु या सर्व अवास्तव खर्चाला फाटा देत वाढदिवसाला वेगळी दिशा देण्याचे कार्य नाशिकमधील निष्णात वकील साहिल ठाकरे यांनी केले आहे. आपणही समाजाचं देणं लागतो, या उदात्त भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे चिरंजीव असलेले ॲड.साहिल ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी सामाजिक बांधिलकी जपल्याचे पहायला मिळाले. साहिल ठाकरे यांनी नाशिक येथील ‘दिलासा केअर सेंटर’ला भेट देत निराधार आजी-आजोबांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला.सेंटरमधील निराधार आजी-आजोबांनी साहिल यांचे औक्षण केले आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी साह...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Image
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्रालयात दिंडोरी व पेठ तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीच्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच दिंडोरी व चंदनपुरी येथील मत्स्य व्यावसायिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, यावर योजना राबवण्यासोबतच विभागाचा भर मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक सामर्थ्य वाढविणे आहे. विभागाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.शर्व ईंनटरप्राईजेचे समीर पोतनीस यांनी बोटींची धडक टाळण्यासाठी भारतीय बनावटीचे शर्व एआयएस यंत्र बोटीवर बसविण्यासंदर्भात सादरीकरण केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता,रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचाराबाबत महत्वाची माहिती

Image
‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात ! नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देताना राज्य सरकारने निरामयी महाराष्ट्रासाठी विविध योजना आणि उपक्रमांची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजातील सर्वच घटकांना या योजनांच्या लाभाच्या परिघामध्ये सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकातील गरजू रुग्णांची बऱ्याचदा कुचंबणा होत असते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जाणिवेने सुरू केलेला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’! 14 हजार रुग्णांना 128 कोटींची मदत ! खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करून गुंतागुंतीचे आजार असलेल्या रुग्णांना बरे केले जाते परंतु आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना ही महागडी उपचार पद्धती परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्यात आला. या माध्यमातून हृदयविकार, यकृत, हृदय व गुडघा प्रत...

कनिष्ठ अभियंता वैभव घुगे यांच्या भ्रष्टाचाराची मारहाण प्रकरणाची चौकशी होणार - गृहराज्यमंत्री योगेश कदम

Image
सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणार - गृहराज्यमंत्री योगेश कदम  शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम यांनी वैभव घुगे यांची केली होती तक्रार नाशिक :- त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कनिष्ठ अभियंता वैभव घुगे यांच्या शेकडो कोटींच्या कथित भ्रष्टाचार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मारहाणीच्या तक्रारींची दखल अखेर शासनाने घेतली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच चौकशी समिती प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सह संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी यापूर्वीच विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी केली होती. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांसह तक्रारीमुळेच शासनाला या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे लागले. नागरिकांच्या तक्रारी, विभागातील आर्थिक गैरव्यवहार,आणि पदाचा गैरवापर करून निर्माण झालेल्या भयाच्या वातावरणाचा सखोल तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चौकशी पारदर्शक व निष्पक्ष व्हावी यासाठी स्थानिक ...

सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Image
सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाकरिता नवीन अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, दि. १७ : सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मत्स्यक्षेत्रातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आयटीआय मार्फत ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळासाठी लवकरात लवकर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत केली. विधानभवन येथे वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन...

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा मुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे,...

महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुंबई, दि. १७ : ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे. सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला दिले. विधानभवन येथे ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव (वित्त) सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव (सुधारणा) ए.शैला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी., महाऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऊर्जा विभागातंर्गत योजना राबविण्यासाठी वित्त विभागाकडे मागणी केलेल्या सविस्तर प्रस्तावात...

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Image
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रक...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल विधानसभा अध्यक्ष . ॲड. राहुल नार्वेकर

Image
इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे व्हावे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आदी उपस्थित होते. वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याचे संकुल उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहिल, याची काळजी घेण्यात येणार आहे. विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत सेंट्रल हॉल, विधानसभा, विधानपरिषद सभागृह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, विरोधी पक्ष नेते यांचे दालन आदी असणार आहेत. तर शेजा...