Posts

Showing posts from June, 2024

राज्याचा ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात सादर

Image
अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय; शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मुंबई, दि. २८ :  महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापास...

राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मान

Image
इंदिरानगर - विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाबरोबरच अभ्यासाकडे ही लक्ष देऊन आरोग्य अबाधित ठेवावे असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले. मोदकेश्वर सेवा ट्रस्ट इंदिरानगर संचलित शिखर स्वराज स्केटिंग क्लब संस्थेच्या वतीने या वर्षात विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धानं मधील पदक विजेते तसेच उत्तम खेळाडूंचा आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रज्वल काटे,रितेश दरंदाळे, दुर्गा पाटील,आरीन पाटील, रिहान रावतोळे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,मा नगरसेवक सुनील खोडे,अँड.अजिंक्य साने, मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले व स्वागत मोदकेश्वर संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ यांनी केले. आभार प्रशिक्षक अनुजा चव्हाण यांनी मानले.यावेळी पालक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी चंदन पवार यांची निवड

Image
नाशिक :- भाजपाचे चंदन पवार यांची नमो विचार मंच महाराष्ट्राच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, नमो विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद प्रजापती आणि राष्ट्रीय मुख्य सचिव नरेंद्र पांचाळ यांनी दिल्लीतील मुख्य कार्यालयात याची घोषणा केली.आणि नियुक्तीपत्र देवून सार्थ निवड करण्यात आली आहे. सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या पवार यांना त्यांची कार्यशैली बघूनच जबाबदारी देण्यात आली अशी माहिती मंचचे राष्ट्रीय मुख्य सचिव पांचाल यांनी दिली आहे. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नमो विचार मंचच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या सरकारी योजना आहेत, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी नमो मंचच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे, जनतेला सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळावी आणि त्या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर व्हावी आणि त्या योजनांचा फायदा खरोखर गरीब, शोषित, वंचित आणि मध्यमवर्गीय लोकांना व्हावा याची जबाबदारी नमो विचार मंच घेणार आहे. सामाजिक संघटन असलेल्या नमो विचार मंचचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात असणार आहे, सर्व राज्यांमध्ये जि...

शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण

Image
कोल्हापूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासन यांच्या पुढाकाराने राज्यभरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवित आहे. माविमचे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिलांना माविमच्या अनेक योजनांचा लाभ दिला जात असून यामुळे महिला उद्योग उभारणीत पुढे येत असल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेऊन स्वतः सक्षम बनण्याबरोबरच अन्य महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील महिलांनी साधलेल्या सर्वांगीण प्रगतीच्या यशोगाथा त्यांच्याच तोंडून… फुलशेतीतून साधली सर्वांगीण प्रगती महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथून महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती मिळाली. यानंतर मी फुलशेती व्यवसाय करण्याच्या विचाराने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील फुलशेतीमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामं...

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग

Image
मुंबई :- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक प्रमुख शहर आहे. दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई क...

कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना

Image
विविध पिकांच्या संकरीत वाण निर्मितीमुळे देशांत हरितक्रांतीचा पाया घातला गेला. यानंतरच्या काळातील पंचवार्षिक योजनांद्वारे शेती विकासावर विशेष भर देण्यात आला. कृषी विद्यापीठातील सुधारीत तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र भेटी, कृषी तंत्रज्ञान प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कृषी उत्पादनवाढीमध्यें मोलाची भर पडली. या मुळे आपण अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो असलो तरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता हे कृषी विभागाचे एकमेव उद्दीष्ट नसून शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनांचा परिपूर्ण वापर करुन अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देणे हे सुद्धा नितांत गरजेचे आहे. यासाठी व्यापारक्षम शेतीची कास धरावी लागेल. मुक्त आर्थिक व्यवस्था व जागतीक व्यापार व्यवस्थेचा फायदा करुन घेण्याच्या दृष्टिने कृषी, फलोत्पादन व जलसंधारण क्षेत्रात कृषी उत्पादन वाढ, निर्यातवृध्दी व कृषि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अनेकविध योजना कृषी विभागामार्फत राब...

५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन व काव्य गायन स्पर्धेचे आयोजन

Image
नाशिक  :- साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात नवोदित प्रतिभांना वाव देण्यासाठी नाशिकचे विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद भालेकर यांनी एका अभिनव स्पर्धांचे आयोजन केले आहे . इयत्ता पाचवी ते दहावी ते विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत निबंध लेखन आणि काव्य गायन या दोन स्पर्धांचा समावेश असून म्हणजे त्यांना मानाची पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमधील अंतर्निहित कलागुणांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्या प्रतिभेला एक सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. निबंध लेखन स्पर्धेसाठी निवडलेले विषय हे सदरील प्रमाणे असणार आहेत :  1. छत्रपती शिवाजी महाराज: स्वराज्याचे संस्थापक  2. माझी जिद्द व यशाची गळाभेट!  3. अर्धवट शिक्षण, बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी.  4. पर्यावरण संरक्षण: काळाची गरज  5. भारतीय संस्कृती आणि परंपरा: बदलत्या काळात त्यांचे महत्त्व सदरील पाच विषय आहेत.  काव्य गायन स्पर्धेत एक नाविन्यपूर्ण घटक म्हणजे वैयक्तिक सादरीकरण बरोबर सामूहिक काव्यगायनाचाही समावेश आहे. या माध्यमातून विद...

छत्रपती शाहू महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने पेढे वाटून साजरी

Image
नाशिक :- छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांचे अतुलनीय आणि मौल्यवान कार्य-विचार स्मरून छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले. राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे देशहितकारक, सत्यशोधक विचार कार्य तळागाळात पोहोचावे, आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढीला ते प्रेरक, मार्गदर्शक ठरावे, त्यातूनच सुजलाम, सुफलाम, संघटीत, लोककल्याणकारी देश घडावा हा प्रामाणिक हेतू आहे.उदोजी मराठा बोर्डिंग (मवीप्र)गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्या समोर हा देखणा सोहळा पार पडला  आजच्या कार्यक्रमावेळी जयंती निमित्त पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दांडेकर दीक्षित तालीम संघांचे पै.हिरामण नाना वाघ पै.लक्ष्मण भास्कर पै.दीपक देवकर छपरीच्या तालमितील पै.शरद प्रभाने मोहन मास्तर तालीम संघांचे पै.दत्तू पाटील यांचा सन्मान करण्यात आला व त्याचबरोबर श्रीराम मर्दानी खेळाचा आखाडाचे सर्वेसर्वा आनंद ठाकू...

मविप्र तून तयार व्हावेत ऑलिम्पिक खेळाडू - ॲड नितीन ठाकरे

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तसेच गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२३) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी, मान्यवर व शिक्षकवृंद मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात ऑलिम्पिक डे साजरा नाशिक : मविप्र संस्थेत शालेय शिक्षणाबरोबरच क्रिडाविषयक शिक्षण व उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आजवर संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये खेळाडूंसाठी पोषक वातावरण असून, भविष्यात संस्थेतून ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत व संस्थेचे व देशाचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तसेच गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२३) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, चांदवडचे संचालक...