पीएम स्वनिधी योजनेंतर्गत "मैं भी डिजिटल ४.०" मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन, १७ फेब्रुवारीपर्यंत मोहीम सुरु राहणार

नाशिक: ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेंतर्गत नाशिक शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना "मैं भी डिजिटल ४.०" मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे हे आहे. लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करतांना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे. याकामी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे. 
एनयूएलएम विभागाशी संपर्क साधावा
नाशिक शहरात दि. ०७ फेब्रुवारी २०२३ ते दि. १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत "मैं भी डिजिटल ४.०" नावाची मोहीम राबविणेत येत आहे. त्यानुसार पीएम-स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्यापपावेतो डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथ विक्रेत्यांनी आपल्या नजीकच्या मनपा विभागीय कार्यालयात एनयूएलएम कक्षाशी संपर्क साधून डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त डिजिटल ऑन-बोर्डिंगद्वारे मिळणाऱ्या कॅश बॅकचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन मनपा अतिक्रमण विभाग उपायुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला