Posts

Showing posts from 2025

कुंभमेळ्यात नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी - मुख्य सचिव राजेशकुमार

Image
विकास कामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश नाशिक,दि.८ :- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभेमळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभपर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भुसावळ) पुनीत अग्रवाल,नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्...

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

Image
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरीवर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५ एचपीपर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मार्च २०२४ अखेर ४७ लाख ४१ हजार इतके कृषी पंप ग्राहक असून या ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दश लक्ष युनिट आहेत. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जून २०२४ महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात उप...

अमृत दुर्गोत्सवात नाशिककरांनी सक्रिय सहभागी व्हावे - मनिषा खत्री मनपा आयुक्त नाशिक

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा सन्मान दिल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या “अमृत महाराष्ट्र” या स्वायत्त संस्थेतर्फे “अमृत दुर्गोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.या दुर्गोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना विश्वविक्रमी मानवंदना देण्याचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री,यांनी नाशिककरांना आवाहन केले आहे की“प्रत्येक घर, सोसायटी, अपार्टमेंट अथवा मोकळ्या जागेत गडदुर्गांची प्रतिकृती साकारून या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रमात सहभागी व्हा.”या गडदुर्गांच्या प्रतिकृती www.durgotsav.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेद्वारे अपलोड करता येतील. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबासह यात सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.नाशिक ही कुंभ नगरी म्हणून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची अनेक दुर्गस्मृती येथे जिवंत आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या ...

रेल्वे पोलीस, सुरक्षा बल संयुक्त राष्ट्रीय एकता दौड

Image
रेल्वे पोलीस,सुरक्षा बलाच्या वतीने एकता दौड विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक रोड :- रन फॉर युनिटी कार्यक्रमा करिता रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड व रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड असे संयुक्त रिक्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेऊन रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथून एकता दौड सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,देवी चौक पुन्हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे एकता दौडची सांगता झाली.सदर कार्यक्रमा दरम्यान वसंत भोये,उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड, रे.पो. स्टे. नाशिक रोड येथील API सचिन बनकर, व 15 अंमलदार व RPF निरीक्षक नवीन प्रताप सिंह व RPF कर्मचारी 34, रिटायर्ड स्टेशन मास्तर आर्या साहेब तसेच रेल्वे रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर खडताळे, व रिक्षा चालक,आदी उपस्थित होते.

दुबार नावाबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Image
मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश मुंबई, दि. 29 (रानिआ): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी,असे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहाय; तसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजीत केली जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारुप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नाव...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Image
नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ - मुख्यमंत्री सातारा, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. फलटण येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. फलटण ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त क...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, शुभारंभ

Image
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक - उपमुख्यमंत्री पुणे, दि. २६ : देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून, या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर आपल्या श्रद्धेचेही आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उ...

त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधील१ कोटी ११ लाख रुपयांची मदत

Image
नाशिक, दि. २५ :- त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, सचिव तथा मुख्याधिकारी राहुल पाटील,लक्ष्मण सावजी, विश्वस्त रुपाली भुतडा,पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार,मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी उपस्थित होते.निवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची १० लाख रुपयांची मदत तत्पूर्वी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले,या निवृत्त दाम्‍पत्याने १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्थेच्यावतीने तज्ञ संचालिका रुपाली परेश कोठावदे,यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश,आर. के. ट्रेडिंगचे संचालक श्रीधर रामचंद्र कोठावदे (सटाणा जि. नाशिक) यांनी ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यम...

प्रभाग क्रमांक २० येथे सांज पाडवा कार्यक्रम संपन्न नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Image
ना रोड :- प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे यांच्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले.भावगीतांनी आणि भक्तीगीतांनी नागरिकांची मने जिंकली.यावेळी गणेश उत्सव आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या विजयादशमी उत्सव लकी ड्रॉ विजेत्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत बालगोपालांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात येवून नावे जाहीर करण्यात आली.तसेच विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली.नाशिक रोड विकास मंच संस्थापक गणेश कदम,आणि स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “सांज पाडवा स्वर प्रल्हादाचा” या भावगीते आणि भक्तीगीतांच्या कार्यक्रमात प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे,यांनी आपल्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सखे चल ग सखे पंढरीला'' विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत,दोनच राजे इथे गाजले,एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर”तसेच “तुफानातले दिवे” “कव्वाली” यांसह अनेक भावगीते आणि भक्तीगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.उपस्थित नागरि...

अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर उमटली आनंदाची झळाळी

Image
सिन्नर :- ठाणगाव येथील समर्थ सावली बाल संगोपन केंद्रात सकल मराठा परिवार तर्फे सामजिक बांधिलकी जपत दीपावली साजरी करण्यात आली. या उपक्रमात मुलांना फक्त वस्तू नव्हे तर आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श देण्यात आला. दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलताना पाहून सर्व उपस्थित सदस्य भारावून गेले.तसेच सकल मराठा परिवाराच्या सदस्यांनी आश्रमातील मुलानं बरोबर काही वेळ घालून त्यांच्या बरोबर अल्पोहार करत त्यांच्या शी हितगुज केले.त्यांच्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.माता पित्यापासून दूर असलेल्या पाखरांना मायेचा ओलावा देण्यात आपला खारीचा वाटा असावा असे मत सकल मराठा परिवार चे आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो असे मत सगळ्या परिवाराने मांडले.याकार्यक्रमाचे आयोजन डॉ.विकास मेदगे,समाधान दळवी, दीपक कोरडे,महेश मुरकुटे,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास सकल मराठा परिवारचे अनेक सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी दत्ता काळे,यांनी आपले विचार मांडले तसेच खंडू आहेर,यांनी सर्वांचे आभार मानले.अनाथ आश्रमाचे संचालक जयराम शिंदे,यांनी आपल्या आश्रमाची महिति देत सकल मराठा परिवाराचे आभार मानले.कार्यक्र...

दिवाळी निमित्त दिव्यांगांना नाशिक प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किराणा किट वाटप

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- दिपावली सणोत्सवा निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण असताना समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना ही दिवाळी साजरी करता यावी यासाठी माजी राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने शहरातील गरजु दिव्यांगांना किराणा वाटप करण्यात आले,प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, यांनी दिवाळी निमित्त पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले,या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,उपजिल्हाध्यक्ष रूपेश परदेशी,प्रमोद केदारे,सुदाम श्रीसुंदर, ज्योत्स्ना सोनार,आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी

Image
दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती मुंबई, दि. २० : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो. मागील काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती. उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, सामाजिक न्याय मंत्री  शिरसाट यांनी आमदारांना दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.हा निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

मोदीजी यांच्या वतीने दीपावली निमित्त शुभेच्छा संदेश

Image
प्रिय समाधान जी,  ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दीपावली आहे. भगवान श्री राम आपल्याला धार्मिकतेचे रक्षण करायला शिकवतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य देखील देतात. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण याचे जिवंत उदाहरण पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने केवळ धार्मिकतेचे रक्षण केले नाही तर अन्यायाचा बदला देखील घेतला.  ही दिवाळी विशेष आहे कारण, पहिल्यांदाच देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये दुर्गम भागांचाही समावेश आहे, दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात, आपण अनेक व्यक्तींना हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना पाहिले आहे, आपल्या देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त करत आहेत. ही देशासाठी एक मोठी उपलब्धी आहे.  या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, अलिकडच्या काळात देशाने पुढील पिढीतील सुधारणांवरही काम स...

आ.देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत सांज सुरेल गीतांची मैफील संपन्न

Image
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दिपालीनगर येथे सांज सुरेल गीतांचा मैफिल संपन्न (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २३ भाजप चे माजी नगरसेवक यशवंत निकुळे , माजी नगरसेविका रुपाली निकुळे,विनयनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने दिपावली सांच मैफिलीचे आयोजन जयप्रकाश छाजेड उद्यान येथे रविवारी (दि१९) सायंकाळी करण्यात आले होते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली),पार्श्वगायिका कुमारी खुशी भोजक, यांनी कानडा राजा पंढरीचा,चला जेजुरीला जाऊ, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, राधा ही बावरी आदींसह सुप्रसिद्ध भक्तीगीते भजन,हिंदी, मराठी गीते सादर करत रसिक श्रोत्यांची मने गायकांनी जिंकली.त्यांची गायक अर्जुन तांबे, गायिका मिनल धोडपकर,कीबोर्ड अनिल धुमाळ, तबला महेश धोडपकर,ऑक्टोपॅड देवानंद पाटील, प्रतीक पाटील यांनी साथ दिली.याप्रसंगी सूत्रसंचालन सचिन जाधव,यांनी केले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे या उपस्थित होत्या. या ठिकाणी सुसज्ज असे उद्यान उभार...

समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण ‘संजीवनी’योजनेंतर्गत दोन टप्प्यात एकूण ७५५ ई-रिक्षांचे दिव्यांग व्यक्तींना वाटप नागपूर, दि. १९ :- सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत. त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्याचा उपक्रम याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवंगत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने ई-रिक्षा व इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन ...

महाज्योती च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
'महाज्योती'च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन नागपूर, दि. १९ :-  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे.  येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ....

नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान प्रवाशांना लुटणारे तीन रिक्षाचालक ताब्यात

Image
नाशिक :-  शहरातून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणारे ३ रिक्षाचालक जेरबंद.प्रवाशांकडून मोबाईल,रोख रक्कम व सोन्याची बाळी लुटली होती.पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे मेळा स्टँड परिसरातून तिघे संशयित आरोपीतांना अटक केली आहे.त्यांच्याकडून रु१,८८,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-१ घ्या पथकातील पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल,आणि पोउपनि चेतन श्रीवंत,अंमलदार संदिप भांड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी,नाझीमखान पठाण,शर्मिला कोकणी,मुक्तार शेख,अमोल कोष्टी,अनुजा येलवे,मनिषा सरोदे यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

Image
मुंबई दि. १८ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६३ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग (Department of Sainik Welfare, Pune) च्या वेबसाईटवरून SSB-६३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे. पात्रता  या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे: कंबाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकेडमी एक्झामिने...

अपहरण मारहाण झालेल्या दोघांची पोलीसांनी केली सुटका

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मालेगाव :- दि.१७/१०/१/२०२५ मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर अपहरण मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीतांना अटक करुन ओडिसा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे.सदर घटनेबाबत हकीकत अशी की फिर्यादी टीपी प्रसाद राजू,वय २९ वर्ष राहणार पुकाली,जिल्हा कोरापुर,राज्य ओडिसा व त्यांचा मित्र जलंदर पोडाल,हे दि.०९/१०/२०२५ रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता समाधान निंबा देवरे, राहणार मेहुने तालुका मालेगाव व त्यांचे चार साथीदार यांनी धुळे टोल नाका परिसरातून फिर्यादी व त्यांच्या मित्राचे अपहरण करून मालेगाव येथील हाॅटेलमध्ये डांबून ठेवले दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.सन २०२० मध्ये जबरदस्तीने घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी दबाव आणला यातील आरोपीतांनी फिर्यादी कडून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहाराद्वारे ४० हजार रुपये तसेच त्यांच्या ताब्यातील KIA कंपनीची CARENS कार क्रमांक OD-10-W-2682 दोन मोबाईल फोन असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज बेकायदेशीर पणे काढून घेतला सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठ...