गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात ४४,७१० कोटींची गुंतव णूक आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार ७,०३० रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगसमूहांसाठी राज्य शासनाने सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली असून गुंतवणुकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळामुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवन,मुंबई येथे उद्योग विभागाच्या वतीने आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगण, उद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार तसेच आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 7,030 रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्य शासनाने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी केली आहे.शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो,असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे.त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास श...