Posts

Showing posts from January, 2023

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करावे - पालकमंत्री शंभुराजे देसाई

Image
(साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख- संपादक समाधान शिरसाठ) मुंबई, दि. 31 : आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरूस्ती, बस स्थानक आगारातील स्वच्छता गृह, तालुका स्तरावर नवीन बस उपलब्ध करून देणे, रोना ते कोंडाळी महामार्गाचे बांधकाम, समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान अशा विविध विषयांसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री  देसाई यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री  देसाई म्हणाले, आळंदी ते पंढरपूर दरम्यान सासवड ते माळशिरस पर्यंतच्या पालखी महामार्गाच्या रस्त्याचे उर्वरित ३५ टक्के काम तातडीने पूर्ण करावे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना महामार्गालगतच्या नाल्यातील पाणी वळवावे जेणेकरून ते शेतात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यासाठी तातडीने...

ऑल इंडिया धनगर महासंघाचे अध्यक्ष प्रवीण काकडे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Image
पुणे  : प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य दादासाहेब इदाते  प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रवीण काकडे हे गेली अनेक वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करत असुन कोरोना काळात अहिल्या देवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने राज्यातील डोंगरी व दुर्गम भागातील व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या व दरड ग्रस्त भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान काकडे यांनी दिले आहे. असे प्रतिपादन प्रसंगी दादासाहेब इदाते, राष्ट्रीय अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती आयोग भारत सरकार यांनी केलेे. ते  प्रवीण काकडे यांना ईगल फाऊंडेशन च्या वतीने एम आय टी युनिवर्सिटी कोथरूड पूणे येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्या प्रसंगी बोलत ह...

समाज सेवेचा ध्यास घेतलेला तरुण परिमल चव्हाण

Image
नाशिक : नाशिक शहरातील मेरी म्हसरूळ परिसरातील परिमल चव्हाण धर्मरक्षित फाऊंडेशन चे संस्थापक गेल्या काही महिन्यापासून फाऊंडेशन च्यामाध्यमातून  सर्व मित्रांना बरोबर घेऊन समाजसेवेचे काम करत असून परिमलला लहान पणापासूनच  समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे अशी प्रचंड इच्छा, मग परिमल जमेल त्या मार्गाने मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले. कोणीही गरीब असाह्य व्यक्ती दिसली की यथाशक्ती अन्नदान करणे  हा त्यांचा नित्यक्रम झाला हे करित असतांनाच परिमल यांच्या दृष्टीस रस्त्यावरील परिसरातील बर्‍याच वर्षांपासून भटकंती करणारे मनोरुग्ण, किंवा कुटुंबाने नाकारलेले वयस्कर आज्जी आजोबा वयस्कर व्यक्ती नेहमीच दिसत असत आपण  त्यांच्यासाठी काही तरी करायला हव त्याकरिता सामुहिक शक्तीची लोकसहभागातून मदत करता येईल हा  विचार मनात ठेवून परिमल चव्हाण यांनी सहकार्यांना बरोबर घेऊन धर्मरक्षित फाऊंडेशन ची स्थापना केली.आणि त्यामाध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या या आज्जी आजोबाना निवारा देण्याचे ठरले अणि यासाठी सर्व कसरत सुरू झाली. या सर्व उपक्रमात चव्हाण यांची साथ  सुख समृद्धी सेंटर...

दैनिक बालेकिल्ला मालेगाव 33वा वर्धापन दिन साजरा, अरुण दादा शिरोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

Image
मालेगाव : दैनिक मालेगाव बाल्लेकिल्ला च्यावतीने गुणवंत व समाजसेवक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी समाजसेवक व प्रसिद्धी प्रमुख न्युज चे नासिक जिल्हा प्रतिनिधी  अरुण दादा शिरोळे यांचाही पुरस्काराने देऊन गौरव करण्यात आला.  प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारी रोजी दैनिक बालेकिल्ला यांच्या ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील अँड शिशीर हिरे डॉ सुगन बरट, जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, संपादक निवृर्ती बागुल, सुरजमल जैन, एकनाथ बागुल, आदी मान्यवर च्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमात विषेश उल्लेखनिय कार्य करणारे व्यक्तींना स्मुर्ती चिन्ह प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजसेवक वकिल अँड एल के निकम, योगप्रसारक स्वाती मराठे, बहुजन रयत चे अध्यक्ष कैलास वाळके, कोरोना काळात उलखनीय कार्याबद्दल सुमित पगारे, राजेंद्र लोंढे, मनोज जैन, शिवसेना मालेगाव महानगर प्रमुख अरुणा चौधरी, महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शक मनीषा महाजन, समाजसेवक शिक्षक भाऊसाहेब बच्छाव, मांगीतुंगी देवस्थान चे उत्कुष्ट कार्य डॉ सुरजमल जैन, नि...

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यालय उद्घाटन, रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आम आदमी पक्षाच्या मध्य विधानसभा क्षेत्रात प्रभाग जुने 23/ नविन 28 येथे नविंदार अहलुवालिया यांचे संपर्क कार्यलयाचे उदघाटन अँड धनराज वंजारी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते करण्यात आले, तसेच यावेळी रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी परिसरातील नागरिकांनी तसेच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरात  सहभाग घेतला. एडव्होकेट  प्रभाकर वायचळे मध्य व पश्चिम विधानसभा अध्यक्ष ,गिरीष उगले देवळाली नाशिक रोड विधानसभा अध्यक्ष ,योगेश कापसे पूर्व विधानसभा अध्यक्ष, अमोल लांडगे ,अनिल कौशिक,अल्ताफ शेख विलास मोरे , कस्तुरी आटवने, बाळासाहेब बोडके, माजिद पठाण, साहिल सिंग, हेंमत राउत, एकनाथ सावळे, सुमीत शर्मा, चेतन आहेर, शकील शेख,अमर गांगुर्डे संदीप गोडसे, शुभम पडवळ ,प्रदीप लोखंडे  श्वेता आहेर , संकेत शिसोदे ,सादिक अत्तार ,डॉ.भगवान सराटे, मेघराज भोसले, दिलीप कोल्हे, नितीन ठाणेकर, , पियुष बाफना, नितीन डांगे,फैजान आझाद, स्वप्नील घिया, अभिजित गोसावी, महेंद्र मगर,आदी उपस्थित होते.

ABB कंपनी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मनाजमेंत यांचे विद्यमाने उद्योग क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयांवर चर्चा सत्र संपन्न

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) ABB कंपनी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मनाजमेंत यांचे विद्यमाने उद्योग क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयांवर चर्चा सत्र संपन्न झाले असून या वेळी निपम चे अध्यक्ष प्रकाश बारी, सरचिटणीस हेमंत राख, निपम चे माजी अध्यक्ष उदय खरोटे ABB चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कोठावदे मनुष्यबळ विकास महाव्यवस्थापक दयानंद कुलकर्णी, आदींसह ABB चे व्यवस्थापकीय अधिकारी  निपम पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. सातपूर औद्योगिक वसाहतीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या ABB इंडिया कंपनीस आयजिविसी संस्थेकडून प्लॅटिनम अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.कंपनीने राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती कंपनीचे मुख्याधिकारी गणेश कोठावदे यांनी दिली. जागतिक पातळीवर झपाट्याने उद्योग बदल होत असतात त्या अनुषंगाने मनुष्यबळ विकास क्षेत्रातील कार्यपद्धती वर संभाव्य परिणाम व या परिस्थितीत एच आर मॅनेजरस कडून च्या अपेक्षा या सह विविध महत्वाच्या विषयावर गणेश कोठावळे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मनुष्य बळ विकास महाव्यवस्थापक दयानंद कुलकर्णी यांनी  कंपनीतील कामगार व अ...

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी

Image
नाशिक : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे (पीएमएसएमए) आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. गरोदर मातांनी जवळच्या शहरी आरोग्य प्राथमिक  केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाच्या एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) यांनी केले आहे. हे अभियान दर महिन्याच्या ९ तारखेला राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे. मनपा  स्तरावर सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मनपा  स्तरावर माता व बाल संगोपन आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. या अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतीजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत....

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी घटक पक्षांनी एकजुटीने काम करावे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

Image
राज्यात महाविकास आघाडीची ताकद;पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित  नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)  पदवीधर विधान परिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार दिपीका चव्हाण, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शिवसेना उपनेते सुनील बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविताताई कर्डक, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, अशोक सावंत,अर्जुन टिळे,निवृत्ती अरिंगळे, डॉ.सयाजीराव गायकवाड, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, डॉ.योगेश गोसावी, माजी नगरसेवक शैलेश ढगे, समिना मेमन, जगदीश पवार,समाधान जेजुरकर, महेश भामरे,...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Image
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम राष्ट्रवादी भवन मुंबई नाका नाशिक येथे आनंदात संपन्न झाला. नवीन वर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. नववधूंसाठी हा सण खास असतो. हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिला एकमेकांच्या घरी जाऊन वाण लुटतात यामागे आपल्या मैत्रिणीच्या नवर्‍याला उत्तम आयुष्य लाभून तिचा संसार सुखाचा होवो अशी शुभकामना असते. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता ताई भामरे यांनी आलेल्या सर्व महिलांना वाण वाटले. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विधानसभा अध्यक्ष कुंदा सहाणे, मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, सातपूर विभाग अध्यक्ष अपेक्षा अहिरे, नाशिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर चिटणीस रजनी चौरसिया, संघटक संगिता पाटील, युवती शहर कार्याध्यक्ष ऐश्वर्या गायकवाड, कोमल गायकवाड आ...

महाराष्ट्र पोलीस दलातील ७४ पोलीसांना पोलीस पदक जाहीर

महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर नवी दिल्ली, दि. 25 :पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत. देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे. चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)  श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त कावनईत उद्या दिव्यांग भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण

कावनईचे सरपंच व ग्रामस्थ यांचा अनोखा उपक्रम. घोटी प्रतिनिधी स्वतंत्र भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी कुंभमेळ्याचे मूळस्थान असलेल्या कावनई ग्रामस्थ,सरपंच,ग्रामसेवक आणि सदस्य यांनी अनोखा उपक्रम आदर्श घालून दिला  असून उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहनाचा मान गावातीलच दिव्यांग आणि विधवा महिलेला देण्याचा निर्णय झाला आहे. सविस्तर वृत्त असे की,देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येक स्वातंत्रदिनी आणि प्रजासत्ताक दिनी पूर्वाश्रमीचा तालुक्याचे ठिकाण असलेल्या कावनई गावासह लगतच्या ऐतिहासिक किल्ल्यावर महाकाय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते.यावर्षी ही कावनई ग्रामस्थ,ग्रामपंचायत ने ही परंपरा अखंडित ठेवली आहे.यावर्षी येथील ध्वजारोहणाचा मान गावातीलच दिव्यांग आणि विधवा महिला श्रीमती यशोदाबाई विष्णू शिरसाट या भगिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान कावनई ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुनीता गोपाळ पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिनी गावातील ग्रामपंचायतच्या ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ नागरिक,सैनिक, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करण्याचा मान दिल...

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. २३ : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, २३ व २४ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंबई येथे आयोजित “ई-गव्हर्नन्स” या विषयावरील दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अतिरिक्त सचिव डीएआरपीजी अमर नाथ, सचिव व्ही. श्रीनिवास, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेला शुभेच्छा दिल्...