Posts

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Image
मुंबई दि.१८ -महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या निमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. Governor Acharya Devvrat greets citizens happy Diwali The Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat has greeted the citizens on the occasion of Diwali. In his message the Governor said: “Diwali symbolizes the victory of light over darkness, justice over injustice and positivity over negativity. I appeal to everyone to adopt Swadeshi products. I call upon the peop...

दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी शासनाची मानक कार्यप्रणाली जाहीर

Image
नोंदणी, देखरेख आणि नूतनीकरणासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे निश्चित मुंबई, दि. १७ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ४९-५३ अनुसार दिव्यांगांच्या कल्याण, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची, संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण, पुनर्वसन आणि विकासासाठी कार्यरत नागरी समाज संघटना,संस्थांच्या नोंदणी, देखरेख आणि नूतनीकरणासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी 1995 मध्ये “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम” लागू करण्यात आला, ज्यामध्ये मुख्यतः आरक्षण व मर्यादित सोयी-सुविधा पुरविण्यावर भर होता. पुढे 2016 मध्ये लागू झालेल्या “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम” अंतर्गत दिव्यांगांना समान संधी, हक्क आणि सक्षमीकरणाचा अधिकार देण्यात आला.दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटनांच्या, संस्थांच्या कामकाजात एकसमानता, येण्यासाठी तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, नागरी समाज स...

विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई, दि. १६ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यापीठ आणि महाविद्यालीन विद्यार्थ्यांना प्रेरित करून प्रत्येक क्षण विकसित भारताच्या विचाराने जगला पाहिजे यासाठी ‘विकसित भारत २०४७’ हा उपक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात ...

मराठा उद्योजक सेवा संस्थेचा उपक्रम - ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप

Image
मविप्र महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाशिक मविप्रच्या कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन या दोन महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे. समवेत मराठा उद्योजक सेवा संस्थेचे पदाधिकारी व दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य नाशिक :- आर्थिक स्तर अतिशय कमी असलेल्या होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून किंबहुना त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक सुकर व्हावी, या उदात्त हेतूने मराठा उद्योजक सेवा संस्थेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन या दोन महाविद्यालयांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले.मराठा उद्योजक सेवा संस्था दरवर्षी समाजातील गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आणि योग्य ते निकष लावून विद्यार्थ्यांची निवड करत असते. आणि अशा विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस भरीव अशी आर्थिक मदत केली जाते.या संस्थेने याही वर्षी म्हणजेच 2025 -26 य...

बांधकाम कामगार योजनेसाठी महिलांची पायपीट

Image
नाशिक :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध सवलती दिल्या जात आहेत.तसेच संसार उपयोगी साहित्य वाटप कामगार किट करण्यात येते याकरिता बांधकाम कामगार असल्याची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.नाशिक शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिलांनीही बांधकाम कामगार योजेनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले आहे.मात्र सहा सहा महिने एक एक वर्ष कामगार कार्ड वितरीत होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नाशिक येथील महाराष्ट्र शासन कामगार उपआयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी होत आहे.सदरच्या योजनेचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयाने कार्यवाही करावी.योग्य लाभार्थींना लाभ मिळावी अशी मागणी महिला वर्गातून नागरिकांमधून होत आहे.

पोलीसांची मोठी कारवाई गावठी दारू अड्डे उध्वस्त सोळा इसमावर कारवाई लाखोंचा साठा नष्ठ

Image
वडनेर खाकुर्डी, मालेगाव तालुका हद्दीत गावठी दारूचे अड्डे उध्वस्त पोलिसांची मोठी कारवाई व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- गावठी दारू निर्माण करणारे अड्डे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले उद्ध्वस्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू,यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४/१०/२०२५ रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत तसेच वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत चोरुन लपून चालविण्यात येणाऱ्या गावठी दारू हातभट्टी धंद्यावर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून वडनेर खाकुर्डी,हद्दीतील अंगण,वडेल,सिंधबन वडेल,वडनेर,खाकुर्डी,काष्टी,रावळगाव,गाळणे,आदी भागात १७ ठिकाणी कारवाई करण्यात आली अंदाजे ९ हजार दोनशे लिटर गावठी दारू रसायन,तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.अकरा इसमांना ताब्यात घेण्यात आले.दुसरी कारवाई मालेगाव तालुका हद्दीत बंधारपाडे पाटणे,चिंचवड,पाटणे,येसगाव,गिलाणे,आदी ठिकाणी ११ ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये सात हजार सहाशे लिटर गावठी दारू हातभट्टी रसायन तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट क...

पोलिस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी १४ संशयित ताब्यात

Image
कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणातील १४ संशयित आरोपीत ताब्यात विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे धिंड काढत नेले न्यायालयात, तीन दिवसांची पोलिस कोठडी (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) कळवण :- कळवण पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या १४ संशयितांना पोलिसांनी शनिवारी (दि. ११) ताब्यात घेतले. धिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणातील अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली.बेपत्ता शेतमजूराच्या शोधासाठी नातेवाईक व समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे शेतमजूराच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथके तयार केली. यावेळी बेपत्ता असलेल्या मजूरास पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला होता. आता कळवण पोलिसांनी दगडफेक व तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शनिवारी १४ जणांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच न्यायालयाने सशयितां...