कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्राणांतिक उपोषण


चांदवड : (प्रतिनिधी अरुण शिरोळे) नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली असून कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे.
कांद्याला दोनशे,तीनशे रुपये क्विंटल असा मातीमोल भाव मिळत असल्याने सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात,उत्पादन खर्च पंधराशेच्या वर जवळपास सत्तर टक्के वजा खर्चात कांदा विकला जात आहे.सरकारने शेतकरी बांधवांना किमान ५०० रुपये अनुदान द्यावे, किमान १२०० रुपये भाव, मिळावा,बाजारसमितील अवांतर नियमबाह्य खर्चावर आळा घालावा, समित्यांच्या बाजार भावात तीनशे,पाचशे फरक करू नये याकरिता उपजिल्हानिबंधका मार्फत समिती नेमून काम बघावे, कांदा वादा हे प्रकरण कायमचे मिटवून तसा कायदा करण्यात यावा.कांदा निलावा नंतर १ रुपये किमी पेक्षा जास्त वाहतूक खर्च आकारला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्य वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी प्रहारचे गणेश निंबाळकर,प्रकाश चव्हाण,सह कार्यकर्ते,शेतकरी प्राणांतिक उपोषणाला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन