पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"एसटी प्रवासात सुविधा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे अनावरण

इमेज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती PRASDDHI PRAMUKH  मुंबई, :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ,पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे.याच दिशेने ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे,तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वितरित क...

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

इमेज
वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड मुंबई, दि. ३ :- शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.दि. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली. हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दक्षता पथकाच्या माहितीनुसार,जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबां...

विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे - मिता चौधरी

इमेज
नाशिक :- “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगातून शिकावे, समस्या ओळखून त्यावर उपाय शोधावेत आणि भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी केले. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग,सिमेन्स कंपनी व ISPF (Innovation and Science Promotion Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅकथॉन चॅलेंज २०२५-२६”स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलतांना मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी सांगितले की,या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग ठेवण्याचे व विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो,असे त्यांनी नमूद करून सिमेन्स कंपनीच्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक केले.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडक २४ शाळांमध्ये “जिज्ञासा प्रकल्प” राबविण्यात येत आहे.या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच...

स्वच्छ नंदिनी - स्वच्छ गोदावरी मलनिस्सारण प्रकल्पांना वेग नदीपात्र स्वच्छतेस गती

इमेज
स्वच्छ नंदिनी - स्वच्छ गोदावरी मलनिस्सारण प्रकल्पांना वेग नदीपात्र स्वच्छतेस गती  नाशिक :- शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आढावा घेतला. शहरात विविध ठिकाणी सांडपाणी अडवून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडे (STP) वळविण्याची व्यवस्था उभारण्यात येत आहे,या माध्यमातून थेट नदीपात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यावर भर दिला जात आहे.याच अनुषंगाने मनपा आयुक्तांनी नंदिनी नदी परिसरातील महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आगार टाकळी येथील नंदिनी-गोदावरी संगमावर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता अबाधित राखत सर्व प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करिता उपलब्ध असलेला अल्प कालावधी लक्षात घेता, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात PPP-HAM मॉडेल तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांना गती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.पाटबंधारे विभागामार्फत बांधण्...

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेसाठीजिल्ह्यात ४ एप्रिल रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

इमेज
नाशिक,(जिमाका नाशिक)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुर्नरक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील नावे अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी व्यापक पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांना प्रत्यक्ष पडताळणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.मतदार नागरीकांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक ती माहिती सादर करावी,तसेच नावांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.या मोहिमेद्वारे ज्या मतदारांची नावे सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहेत, त्यांच्या नावांची सन 2002 च्या मतदार यादीतील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे.तसेच ज्या मतदारांची नावे सन 2024 मध्ये आहेत, मात्र सन 2002 मध्ये...

लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी मनपा कर्मचारी निलंबित,गुन्हा दाखल

इमेज
नाशिक  :- महानगरपालिकेच्या पंचवटीतील घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी मनीष जाधव यांनी करदाते व नाशिक महापालिकेची आर्थिक नुकसान करून सुमारे १८ लाख रुपयांचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून,सदर कर्मचाऱ्यावर मनपा प्रशानाकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.मनपा पंचवटी विभागीय कार्यालय अंतर्गत असलेल्या घनकचरा विभागात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने दि.१० सप्टेंबर २५ ते १९ जानेवारी २६ या कालावधीत मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची रक्कम रोख स्वरूपात स्वतःकडे ठेवून त्या बदल्यात नाशिक महानगरपालिकेच्या विविध भरणा केंद्रात स्वतःच्या नावे बँक खात्याचे चेक जमा करून पावती स्वीकारली हे सर्व चेक खात्यात पुरेशी रक्क्म शिल्लक नसल्याने न वटवता परत आल्याचे प्राथमिक चौकशी अंती आढळून आले आहे.निदर्शनास आलेल्या बाबी लक्षात घेता सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने स्वतःचे फायदया करिता शासनाची रक्कम रूपये १७,६३,२५१/- ची आर्थिक फसवणुक करून अपहार केला आहे.त्यावरून सहाय्यक अधीक्षक उदय खैरनार यांनी पंचवटी पोलिसात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याच्या विरोधात अपहार...

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ

इमेज
मुंबई,दि.१:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट,तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये,या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे,ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब...

‘व्हर्टिगो’च्या त्रासातून व्हा मुक्त! अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष क्लिनिक

इमेज
व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे चक्कर येणे (Vertigo), तोल जाणे आणि संतुलनाशी संबंधित समस्यांवर अचूक निदान व उपचार देण्यासाठी विशेष ‘व्हर्टिगो क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक दर बुधवारी कार्यरत राहणार असून, न्यूरोलॉजी आणि कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सेवा उपलब्ध होणार आहे.या क्लिनिकचे नेतृत्व न्यूरोलॉजिस्ट डॉ.विशाल सावळे पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ.प्राची पवार आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.पंकज भट करणार आहेत.या उपक्रमामुळे चक्कर येणे, असंतुलन, डोके हलके वाटणे,कानातील समस्या किंवा मेंदूशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या त्रासाचे अचूक निदान आणि योग्य उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.यावेळी बोलताना डॉ. विशाल सावळे पाटील म्हणाले,“व्हर्टिगो ही अनेक कारणांनी उद्भवणारी समस्या आहे आणि तिचे योग्य निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदू,नसांशी संबंधित आजार किंवा रक्तपुरवठ्यातील बदल यामुळेही चक्कर येऊ शकते. या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना अचूक निदान आणि योग्य उपचार देण्याचा प्रयत्न क...