पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा-पालकमंत्री नितेश राणे
Get Sarees & More Under Rs 249 Only on Shopsy!*Shop Now!* दुरूस्तीसाठी महावितरण विभागाला निधी देणार • तात्काळ खड्डे बुजवा • मोबाईल सेवेला प्राधान्य द्या • बस फेऱ्या वाढवून प्रवाशांना सुविधा द्या सिंधुदुर्गनगरी दि.२१ :- गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. सणासुदीच्या दिवसांत वीजपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्या. बीएसएनएल विभागाने कव्हरेज संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. या दिवसांत बाहेर जिल्ह्यातून बसने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक राहणार असल्याने परीवहन विभागाने तसे नियोजन करावे. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सर्व यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल प...