Posts

Showing posts from March, 2023

वाकी येथील साई भंडारा,भक्ती गीतांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, आयोजकांचे आवाहन

Image
घोटी: वाकी येथे साई श्रद्धा ग्रुपच्या वतीने रामनवमी निमित्ताने भव्य साई भंडाराच्या आयोजन गुरुवार दिनांक ३०/०३/२०२३ रोजी करण्यात आले असून सकाळी १० ते १२ ह्या वेळेत सत्यनारायण पूजा तसेच दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे रात्री ९ ते 11 दरम्यान साई भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार असून सदरचा साई भंडारा कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे. साई श्रद्धा ग्रुप वाकी यांच्यावतीने साई भंडारा तसेच साई भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सातपुरला सरदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव भव्यदिव्य कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Image
सातपूर : (प्रतिनिधी रामचंद्र ताठे) हिंदुस्थानचे युगपुरूष, होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव निमित्त  प्राध्यापक यशपाल भिंगे सर यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न.  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित केलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात नाशिकच्या तुळजाभवानी मैदानावर येळकोट येळकोट जय मल्हारचा निनाद घुमला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक यशपाल भिंगे सर, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांच्यासह प्रहारचे जिल्हा चिटणीस श्री. समाधान भाऊ बागल, खंडेराव पाटील, शिवाजी दादा ढेपले, दत्तू भाऊ बोडके, विनायक काळदाते, शरद भाऊ शिंदे, भास्कार जाधव, देविदास भडांगे, संदिप तांबे, नंदाळे सर, भिवानंद काळे, बापूसाहेब शिंदे, अरुण शिरोळे, शिवाजी ढगे, राजाभाऊ पोथारे, भाऊलाल तांबडे, लक्ष्मण बर्गे तसेच हजारो होळकर प्रेमी उपस्थित होते. इतिहासाची आठवण देणारा हा सोहळा लक्षवेधी ठरला. अध्यक्षा सौ. सोनालीताई पोटे, उ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्राणांतिक उपोषण

Image
चांदवड : (प्रतिनिधी अरुण शिरोळे) नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली असून कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. कांद्याला दोनशे,तीनशे रुपये क्विंटल असा मातीमोल भाव मिळत असल्याने सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात,उत्पादन खर्च पंधराशेच्या वर जवळपास सत्तर टक्के वजा खर्चात कांदा विकला जात आहे.सरकारने शेतकरी बांधवांना किमान ५०० रुपये अनुदान द्यावे, किमान १२०० रुपये भाव, मिळावा,बाजारसमितील अवांतर नियमबाह्य खर्चावर आळा घालावा, समित्यांच्या बाजार भावात तीनशे,पाचशे फरक करू नये याकरिता उपजिल्हानिबंधका मार्फत समिती नेमून काम बघावे, कांदा वादा हे प्रकरण कायमचे मिटवून तसा कायदा करण्यात यावा.कांदा निलावा नंतर १ रुपये किमी पेक्षा जास्त वाहतूक खर्च आकारला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्य वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी प्रहारचे गणेश निंबाळकर,प्रकाश चव्हाण,सह कार्यकर्ते,शेतकरी प्राणांतिक उपोषणाला उपस्थित होते.