पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांकडून गोदावरी तीरावरील घाटांची पाहणी

इमेज
नाशिक दि.२८  :- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंह यांच्यासह महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज सकाळी गोदावरी नदीच्या काठावरील घाटांची पाहणी करून विविध सूचना केल्या. आयुक्त सिंह,यांनी रामकुंड परिसर,गांधी तलाव, पांडे मिठाई पूल,बालाजी कोठ,गणेशवाडी पूल,रामसेतू पूल,गाडगे महाराज पुलासह अमरधामपर्यंतच्या घाटाची पाहणी केली.यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते. आयुक्त सिंह यांनी सांगितले की,आगामी कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांसह देश- विदेशातून भाविक येणार आहेत.त्यांच्या अमृत स्नानासाठी घाट सुरक्षित करावेत. त्यासाठी घाटांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे कठडे बसवावेत.घाटांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करीत पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करावे.भाविकांचे स्नान,वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, घाटांची क्षमता, पाण्याची खोली,विद्युतीकरण, आपत्कालिन मार्गांची पाहणी करावी.या सर्व सुविधा अद्ययावत कराव्...

सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी - महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे

इमेज
  पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड मुंबई, दि. २८ :- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसेच खासगी आस्थापनांनी प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.यासाठी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.ज्या कार्यालये किंवा आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत,त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.राज्यातील शासकीय,निमशासकीय कार्यालये, महामंडळे,स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय कंपनी,नगरपरिषद,तसेच शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाकडून निधी प्राप्त करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करावी लागणार आहे.त्याचप्रमाणे खासगी कंपन्या,उद्योग,सेवा पुरवठादार संस्था,शैक्षणिक संस्था,रुग्णालये,मनोरंजन क्षेत्रातील संस्था,क्रीडा संघटना,क्रीडा संकुले आदी सर्व खासगी आस्थापनांनाही हा नियम लागू आहे.पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास संबंध...

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ :- समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले. संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली.संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार.संजय केणेकर,आ.प्रशांत बंब, सुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले. संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,संत शांतीगिरी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले.देश प्रगतीपथावर नेण्याचे सामर्थ्य संतांच्या मार्गदर्शनात आहे.  

ऑपरेशन सिंदूरचे यश म्हणजे आपल्या दहशतवादविरोधी आणि प्रतिबंधात्मक धोरणातील निर्णायक क्षण - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इमेज
राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये भारतीय लष्कराच्या 'चाणक्य संरक्षण संवाद-2025' परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली :- नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या 'चाणक्य संरक्षण संवाद-2025' या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान,मग ते पारंपरिक, बंडखोरीविरोधी किंवा मानवतावादी असे कोणतेही असो,आपल्या सैन्याने उल्लेखनीय अनुकूलता आणि दृढनिश्चय दाखवला आहे.ऑपरेशन सिंदूरचे अलिकडचे यश म्हणजे आपल्या दहशतवादविरोधी तसेच प्रतिबंधात्मक धोरणातील एक निर्णायक क्षण आहे. जगाने केवळ भारताच्या लष्करी क्षमतेचीच नव्हे तर शांततेच्या शोधात दृढ, परंतु जबाबदारीने कार्य करण्याच्या भारताच्या नैतिक स्पष्टतेचीही दखल घेतली आहे.राष्ट्रपतींनी नमूद केले की, सैन्याकडून तरुणाई आणि मानवी विकास यांच्यामध्‍ये भांडवल म्हणून गुंतवणूक करत आहे. शिक्षण,एनसीसी विस...

सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत - विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम

इमेज
नाशिक दि.२६ :- आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार साडे पाच हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.मान्यता मिळालेली सर्व कामे एकमेकांशी समन्वय साधून जलदगतीने पूर्ण करावीत,असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह,विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया (दूरदृष्यप्रणालीद्वारे),जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त स्मिता झगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे,नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोज डोकचौळे, सहसंचालक लेख...

इंदिरानगरला दत्तजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

इमेज
इंदिरानगर :-परबनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात दत्तकृपा सेवा समितीतर्फे दि. 2 ते 8 डिसेंबर दरम्यान श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त दत्तयाग,दत्त जन्मोत्सव आणि दत्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त 2 डिसेंबर रोजी दत्तदास महाराज,संविदानंद सरस्वती आणि रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल.दररोज सायंकाळी सातला मंत्रजागर,दत्त भक्तिगीते,कीर्तन व दत्तगीत मैफली रंगणार असून,पं.अजित कडकडे,संजीव अभ्यंकरआदींच्या मैफली आकर्षण ठरणार आहेत. 8 डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन,महाप्रसाद व पालखी मिरवणुकीने सोहळ्याचा समारोप होईल.भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

नाशिक परिक्रमा मार्ग भूसंपादन व मोजणीच्या कार्यवाहीला कुंभमेळा प्राधिकरणाची मान्यता

इमेज
नाशिक दि.२५:- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरील नाशिक परिक्रमा मार्ग विकसित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे संपादन व मोजणीबाबत कार्यवाहीला नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या मार्गाचे काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,यांनी दिले आहेत.नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित,नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर),जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,पोलिस अधीक्षक (ग्रामीण...

अहिल्यानगरात मानव बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना

इमेज
अहिल्यानगर दि.२४ :- अहिल्यानगर वनविभागातील वाढत्या मानव बिबटे संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व वन विभागामार्फत अल्पकालीन तसेच दीर्घकालीन स्तरांवर सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा पालकमंत्री दररोज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया व उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याकडून आढावा घेत आहेत.अहिल्यानगर वनविभागात सुमारे १ हजार १५० बिबट्यांची अंदाजित संख्या असून ऊस, मका,नेपिअर गवत, फळबागांचे क्षेत्र व पाण्याची उपलब्धता यामुळे बिबट्यांचा अधिवास मानवी वस्तीजवळ निर्माण होत आहे.परिणामी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी राहुरी व संगमनेर येथे दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम तैनात आहेत.अलीकडील काळात मानवावर हल्ला करणाऱ्या २३ बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. खारे–करजुने परिसरातील दोन बिबट्यांना जेरबंद करून त्यांना माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात कायमस्वरूपाने ठेवण्यात आले आ...

राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा संपन्न धुळ्याचा रितिक राजपूत ठरला उपविजेता

इमेज
इंदिरानगर :- उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आयोजित राजे छत्रपती उत्तरमहाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगरचा चेतन रेपाळे,याने धुळ्याचा रितिक राजपूत याचा ५ विरुद्ध ० गुणांनी पराभव करून 'उत्तर महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब पटकावला.विजयानंतर पाथर्डी ग्रामस्थांच्या हस्ते त्याला चांदीची गदा, ५१ हजार रुपये रोख, तसेच सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. उपविजेता रितिक राजपूत,याला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.तिसरा क्रमांक अहिल्यानगरच्या महेश फुलमाळी,यांनी पटकावला.त्यांना ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.या स्पर्धेला भाजप शहराध्यक्ष सुनील केदार,स्वागताध्यक्ष व माजी नगरसेवक सुदाम डेमसे,माजी नगरसेवक सुदाम कोंबडे,भगवान दोंद,पुष्पा आव्हाड,उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी,सोमनाथ बोराडे,प्रा.मधुकर वाघ,नामदेव गवळी,आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सुनील कोथमिरे,सोनाली नवले,साहेबराव आव्हाड उपस्थित होते. विविध वजनी गटांतील विजेते ३० किलो - विघ्नेश भगत (इगतपुरी),करण भगत (इगतपुरी). ३५ किलो - सत्यम चौधरी (अहिल्यानगर), रुद्र बटाले (दिंडोर...

दिंडोरीसह पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावा - मंत्री नरहरी झिरवाळ

इमेज
नाशिक दि.२४ :-जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न संबंधित विभागांच्या समन्वयाने तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना अन्न औषध प्रशासन व विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी व पेठ परिसरातील रोजगार हमी योजनेमधील वनहरकतीमधील बंधारे वगळणे,गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार,लघुपाटबंधारे योजना देहरेच्या भूसंपादनाबाबतची सद्य:स्थिती,पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट (पूर्व),सिद्धेश सावर्डेकर(पश्चिम),जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे (रोहयो), तहसीलदार मुकेश कांबळे (दिंडोरी)आदी उपस्थित होते.मंत्री झिरवाळ म्हणाले की,दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांसाठी सिंचनाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.या दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस होतो.मात्र, पावसाळ्यानंतर पाण...

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई, दि.२४:- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.उपमुख्यमंत्री पवार,आपल्या शोकसंदेशात म्हणतात,धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता,साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती.‘शोले, ‘चुपके चुपके,‘अनुपमा,‘सत्यकाम,‘दिल्लगी’अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.विशेषतः‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे.धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे.त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला.त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’...

मोबाईल चोरट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या मुद्देमाल हस्तगत

इमेज
ना रोड :- मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांतील आरोपीत ताब्यात याबाबत तक्रारदार चित्रा शामराव निकम वय 40 वर्ष धंदा गृहिणी राहणार रामदास स्वामी नगर लाईन नंबर दोन स्वामी सोसायटी प्लॉट नंबर 203 उपनगर नाशिक यांनी दिनांक 21-11-2025 रोजी नाशिक रोड ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ने प्रवास करण्याकरिता डि वन कोच मध्ये बसत असताना त्यांचा विवो वाय 95 कंपनीचा 13000 रुपयाचा किंमतीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल त्यात जिओ सिम असलेला कोणीतरी अज्ञात इस्मानी चोरून नेला म्हणून दि. 21-11-2025 रोजी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे येऊन मोबाईल गाडी कुठे बाबत लेखी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गु.र.नंबर 227/25 कलम305 सी बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार 520 शैलेश पाटील,यांच्याकडे देण्यात आला खबर अधिकारी एपीआय नरेंद्र खैरनार,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील यांना गुप्त बातमी द्वारा कडून माहिती मिळाली एक काळ जॅकेट घातलेला हाफ पॅन्ट घातलेला ट्रेन वर मोबाईल करणारा इसम मेन गेट जवळ उभा आहे पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,पोलीस ...

महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

इमेज
मुंबई,दि.२२ :- महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्त स्तरावर केले आहे.याबाबत काही हरकती व सूचना किंवा तक्रारी असल्यास दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात,असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.त्यातील मतदारांचे नाव https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर पाहता येईल.त्यावर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप...

इंदिरानगर येथे पाणी प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान

इमेज
इंदिरानगर :-पाणी,प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान परिसरात राबविण्यात आले.येथील स्वामी विवेकानंद शाळा,फडके परिसर,श्रीराम उद्यान रोडवर,वृक्ष मित्रांनी श्रमदान केले.दरम्यान वृक्ष सेवेत झाडांवरच्या वेली काढणे,गवत काढणे, झाडांच्या भोवती आळी करणे,पाण्याची टाकी भरणे व परिसर स्वच्छता करून प्लास्टिक संकलित करण्यात आले.यावेळी सोनचाफा,जास्वंदी शोभेची झाडे लावण्यात आली.ओंकार शौचे,यांनी घरगुती कचरा व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले.जवळच असलेल्या साती आसरा माता मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.प्रसंगी पर्यावरण प्रेमीं उपस्थित होते.दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान मोदकेश्वर मंदिर येथे स्वच्छ व कोरडे केलेले प्लास्टिक व काचा व्यवस्थित पॅकिंग सह रिसायकलिंग साठी संकलित करण्यात येतात.सर्वांनी या कामी सहकार्य व सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

इमेज
मुंबई,दि.२१ :- इमारत देखभाल दुरुस्ती आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाकडे सुमारे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.या पैकी १५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी गेल्या वर्षीच देण्यात आला आहे. तो इमारत देखभाल दुरुस्तीसाठीचा आहे. तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने करावयाच्या पूर्वतयारीसाठी २० कोटी आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी आणखी २२ कोटी ७६ लक्ष असा यावर्षी एकूण ४२ कोटी ७६ लक्ष रुपयांचा निधी नागपूर विभागास वितरित करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे - जिल्हाधिकारी आंचल गोयल

इमेज
मुंबई, दि.२१ : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘तुमचे पैसे, तुमचा हक्क’ हा उपक्रम निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबधित खातेदारास, त्यांच्या वारसांना विनासायास परत मिळण्यासाठी उपयुक्त असून सर्वच बँकांनी या उपक्रमाची अधिकाधिक जनजागृती करावी. तसेच बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढविण्यास आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणण्यास सर्व बँकांच्या माहिती तंत्रज्ञान विभागांनी भारत निवडणूक आयोगाच्या धर्तीवर डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. बँक ऑफ बडोदा या जिल्हा अग्रणी बँकेमार्फत मुंबई शहर जिल्ह्यामध्ये हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा याविषयी यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पुनित पांचोली, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील शर्मा, कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँकेचे महाप्रबंधक शलजकुमार सिन्हा, पंजाब...

त्रंबकेश्वर येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र प्रभाग क्र.१ ब बिनविरोध

इमेज
त्र्यंबक :- नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)‘बारामती पॅटर्न’नुसार एकत्र येत लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दोन्ही गटांनी परस्परांना पाठिंबा देत सामूहिक रणनीती आखली असून स्थानिक स्वराज्य संस्थेत एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.प्रभाग क्र. 1 (ब)  बिनविरोध निवड शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांची भाची मंजूषा रवींद्र वरूणसे,यांची प्रभाग क्र.1(ब) मधून बिनविरोध निवड झाली आहे.या बिनविरोध निवडीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी परस्पर सहकार्य करत एकता दाखवली. त्र्यंबक नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या एकजुटीचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.बिनविरोध निवड शक्य करण्यासाठी योगदान देणारे मान्यवर बिनविरोध निवड निश्चित करण्यासाठी खालील नेत्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व समन्वय साधला,आमदार हिरामण खोसकर,पुरुषोत्तम कडलग विष्णूपंत म्हैसधुने,संपत सकाळे,सुरेश गंगापुत्र,रवींद्र वरुणसे,बहिरू मुलाने या सर्वांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी पक्षाची संघटित ताकद आणि एकदिलाने का...

कथक आकृती नृत्य संस्थेचा प्रक्षेपण सोहळा उत्साहात संपन्न

इमेज
नाशिक :- कालिदास कला मंदिर, येथे कथक गुरू नृत्यश्री विद्या हरी देशपांडे आणि ज्येष्ठ कलाकार सुनील देशपांडे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली.कथक आकृती डान्स कंपनी ही भावी काळात विविध नृत्य संस्था,सांस्कृतिक संघटना तसेच कॉर्पोरेट कार्यक्रमांसोबत सहयोगासाठी खुली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नृत्यकलेच्या प्रसारा साठी आणि नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.कथक आकृतीचे को.फाऊंडर्स श्वेता चंद्रात्रे फडणीस,अनुष्का घुगे,अदिती गोरे- हलकरे आणि रागिणी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात विष्णू वंदना आणि पंडित बिंदादिन महाराज यांनी रचलेल्या"निरतत ढंग"या अष्टपदीने केली.यानंतर कथक आकृतीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना तसेच तराना आणि तोड़े-तुकडे यांची मनोहारी प्रस्तुती सादर केली.पुढे ताल अष्टमंगल ११ मात्रा आणि पंडिता रोहिणी ताई भाटे यांनी रचित"काहे करत भर जोरी, जक्का जोरी"या ठुमरीवर चौघींनी भावपूर्ण अभिनय व लयकरी यांची सुंदर गुंफण सादर केली.कार्यक्रमाची सांगता राग ...

शहरात थंडीचा जोर वाढला नवशा गणपतीला उबदार वस्त्र परिधान

इमेज
नाशिक :-शहरात नऊ दिवस किमान तापमान हे १० अंश व त्यापेक्षा कमी राहिले आहे. त्यामुळे गेल्या नऊ दिवसां पासून नाशिककर थंडीने गारठले आहेत.नाशिक जिल्ह्यात श्री नवश्या गणपतीला उबदार वस्त्र चढवले की थंडी ने जिल्हात जोर पकडला समजून घ्यायचा  नवश्या गणपती महाराजांना थंडीपासून बचाव होण्यासाठी कानटोपी, ब्लॅंकेटने ऊब देण्यात आली असल्याची माहिती नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.

संविधानाच्या रक्षणासाठी फुले विद्यालयात मानवी साखळी

इमेज
नाशिक :- पखाल रोडवरील,महात्मा फुले समाज शिक्षण संस्था संचलित मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि नागरिक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.यात २९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.समाजातील प्रत्येक घटकाला घटनेने दिलेले अधिकार आणि स्वातंत्र्य यांची आठवण व्हावी.यासाठी मानवी साखळीद्वारे उद्बोधन करण्यात आले.'संविधान मूल्यांचा विजय असो' 'सामाजिक न्यायाचे रक्षण करूया'अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. संविधान आणि त्यातील तरतुदींविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी साखळीचे आयोजन मुख्याध्यापक गजानन घरटे, यांनी केले.मानवी साखळी यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक निवृत्ती कमोदकर,जयश्री नेरकर,सरला गायधनी,संजय साळवे,समाधान घरटे,हेमलता पगारे,विजया पगार,गोकुळ माळी,हर्षद गांगुर्डे,तुषार घोटेकर,यांसह आदींनी परिश्रम घेतले.

कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

इमेज
विस्तारीकरणानंतर ताशी प्रवाशी वाहतूक क्षमता पोहोचणार. एक हजारावर  नाशिकच्या हवाई वाहतुकीला जागतिकस्तरावर मिळणार गती. नाशिक,दि. 19 :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करावे,असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची आज सकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा,सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण),एचएएलचे वरीष्ठ अधिकारी आदी सहभागी झाले होते.य...

इंदिरानगर नगर अंडरपास रुंदीकरणासाठी बंद

इमेज
इंदिरानगर :- येथील अंडरपास रुंदीकरणासाठी बंद केला असल्याने अंडरपास येथून येणे जाणे करणाऱ्या वाहतुकीचा ताण लेखानगर येथील अंडरपास येथे आला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.इंदिरानगर अंडरपास रुंदीकरणाचे काम साधारणता नऊ ते दहा महिने चालू राहणार असल्याने येथील वाहतुकीचा ताण लेखानगर अंडरपास येथे येणार असल्याने या ठिकाणी दुभाजक टाकावे तसेच जास्त प्रकाशाचे दिवे लावावेत.गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे तसेच सांकेतिक फलक लावावे जेणेकरून अपघात होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी अशोक चव्हाण,जुगेश चड्ढा, पप्पू चौधरी,मंगेश काठे,आदी व्यवसायिकांनी केली आहे.इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्याने लेखानगर येथील वाहतुकीवर तानाला या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास आपापसात हाणा मारीचे प्रकारही घडले आहेत.अशोक चव्हाण व्यावसायिक यांनी याबाबत प्रतिक्रिया देत याठिकाणी वाहतूक खोळंब्यात एक रुग्णवाहिका अडकली होती.प्रसिध्दी प्रमुख शी बोलताना सांगितले.या वाहतुकीचा...

नाशिक ग्रामीण पोलिसांनी दरोडा खुनाच्या प्रयत्नातील दोघांना घेतले ताब्यात

इमेज
(प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ) नाशिक :- नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल दरोडा व खुनाचा प्रयत्न गुन्हयातील मुख्य आरोपी व नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेले दोन सराईत आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि.१३/११/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास चारचाकी व मोटार सायकल वर आलेल्या अज्ञात ०८ आरोपींनी संगनमत करून गिरणारे येथे फिर्यादीचे गाडीला डॅश मारून चॉपरचा धाक दाखवून/ पैशाची मागणी करून अंगावर गाडी घातली व पोलीस अंमलदाराचे अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला व मुंगसरे रोडवरील किनारा हॉटेल येथे जेवणाचे बिलावरून वाद करून तेथे हॉटेलची तोडफोड करून पार्किंग मधील चारचाकी वाहनांचे काचा फोडल्या बाबत नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.न. १९०/२०२५ भा. न्या. सं.१०९, ,३१०(२),३५१(२),३५२,३२४(४)प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.त्याअनुषंगाने नमूद गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुप्त बातमीनुसार आरोपीत नामे गणेश रतन सोनवणे,२)अभिजीत अनिल वाघ,रा. मखमलाबाद शिवार,ता.जि.नाशिक येथे शिताफीने ताब्या...

नाशकातील रस्त्याच्या समस्या प्रश्नी आ.देवयानी फरांदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

इमेज
मुंबई :- नाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे,यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत महापालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत गंभीर अवस्था लक्षात घेऊन मध्य नाशिक आमदार प्रा. देवयानी फरांदे,यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शहरातील व्यापक समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.खड्डेमय रस्त्यांमुळे वाढलेली अपघातसंख्या,दैनंदिन वाहतुकीची होत असलेली प्रचंड कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या सर्व बाबींवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. नाशिकमधील वर्तमान स्थिती मुख्य निरीक्षणेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास खालीलप्रमाणे आणून देण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते व उपरस्त्यांची गंभीर दुरवस्था खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा, अपघातांची वाढ महापालिकेच्या पॅचवर्कमध्ये सुसंगततेचा अभाव — सील कोट न दिल्याने काम अल्पाव...

कालीदास कलामंदिर येथे रस मिलन कथक नृत्य आयोजन

इमेज
(प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ) नाशिक :- नृत्यश्री गुरु विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या श्वेता चंद्रात्रे,फडणीस,अनुष्का घुगे,रागिणी कुलकर्णी,अदिती गोरे, हलकारे यांची कंपनी कथक आकृती आयोजित रस मिलन सत्र पहिले दि.२१ नोव्हेंबर रोजी सायं ५:३० वा.कालिदास कला मंदिर येथे होणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या विद्याहरी देशपांडे,यांच्या हस्ते कंपनीचे उद्घाटन होणार आहे.यानिमित्ताने श्वेता चंद्रात्रे फडणीस,अनुष्का घुगे,रागिणी कुलकर्णी,अदिती गोरे, हलकारे आदी सह समस्त शिष्य परिवार रस मिलन कथक नृत्य सादर करणार आहेत.या कार्यक्रमाला साथ संगत तबला अद्वय पवार,स्वरःअभिजीत भाटजीरे,सितार प्रतिक पंडित,वेस्टर्न पर्कशन प्रफुल्ल पवार,बासरी समृद्ध कुटे,पढंत वृषाली राव,करणार आहे.प्रवेश सर्वांना खुला असून उपस्थित रहावे असे आवाहन कथक आकृती कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क :- अशोक घुगे 7588557384

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज - राज्यपाल आचार्य देवव्रत

इमेज
निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न पुणे,दि.१८:- निसर्गोपचार, आयुर्वेद,आपली पूर्वीची जीवनशैली,नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू,असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील,असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन,पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग,आदी उपस्थित होते.भारत सरकारने आयुष मंत्रालय स्थापन करून भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींना पुन्हा जिवंत करण्याचे मोठे अभियान चालविले आहे, असे सांगून राज्यपाल देवव्रत म्हणाले,आपल्याला निसर्गाकडे पुन्हा परतण्याची गरज आहे.पूर्वी विषयुक्त शेती नसल्याने आजारांपासून दूर होतो.चाळीसेक वर्षापूर्वी आपली जीवनशैली चांगली होती तेव्हा आजारांपासून आपण द...

अकरा वर्षांच्या ९५ किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकव्हरला यशस्वी शस्त्रक्रिया

इमेज
प्रेडर–विली सिंड्रोम असलेल्या ११ वर्षांच्या ९५ किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी (प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ) नाशिक :- प्रेडर–विली सिंड्रोम (Prader–Willi Syndrome) या दुर्मिळ जनुकीय विकारामुळे असह्य भूक,सतत खाणे आणि झपाट्याने वाढणारे वजन यामुळे त्रस्त असलेल्या ११ वर्षांच्या ९५ किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ बॅरियाट्रिक सर्जन डॉ.संदीप सबनीस,यांनी लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.या मुलाला अतिवजनामुळे झोपेत श्वासोच्छ्वासाचा त्रास (स्लीप ॲप्निया), हालचालींमध्ये अडचण,तसेच भविष्यात डायबेटिस आणि हायपरटेन्शनचा गंभीर धोका निर्माण झाला होता.पारंपरिक आहार-नियंत्रण पद्धतींनी परिणाम दिसत नसल्याने तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय समितीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सखोल मूल्यमापनानंतर ही शस्त्रक्रिया डॉ.संदीप सबनीस,व पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. तुषार गोडबोले,यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मुख्य अॅनेस्थेशिया डॉ.संदीप भंगाळॆ, आणि सर्जन डॉ. प्रखर गुप्ता,यांनीही या...

इस्रो भेटीहून परतले मराठा हायस्कूलचे विद्यार्थी

इमेज
विद्यार्थ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी (प्रतिनिधी समाधान रमेश शिरसाठ) नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,यांच्या संकल्पनेतून आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.भास्करराव ढोके,यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील मराठा हायस्कूलचे ४० विद्यार्थी व ६ शिक्षक बंगळुरु येथील इस्त्रो संस्थेची भेट घेऊन नुकतेच परतले आहेत.इस्त्रो अंतराळ संशोधन संस्थेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची अनोखी संधी मिळाली.  शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,“कुतूहल हे संशोधनाचे पहिले पाऊल आहे. प्रश्न विचारायला कधीही घाबरू नका.”या वाक्याने विद्यार्थ्यांमध्ये अपार ऊर्जा निर्माण झाली.विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा,नियंत्रण कक्ष,मॉडेल प्रदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात वैज्ञानिक बनण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.इस्रो या संस्थेने विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.उपक्रमासाठी सर्वतोपरी सह...

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

इमेज
मुंबई, दि.१७ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.तसेच,ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.या अनुषंगाने पात्र महिलांना ...

सकल मराठा परिवारतर्फे आयोजित एकदिवसीय महारक्तदान शिबिरात ७६२ रक्त पिशवी संकलन

इमेज
नाशिक :- राज्यभरात निर्माण झालेल्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार सकल मराठा परिवार तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याचा एक भाग म्हणून नाशिक येथे रेडियंट हॉस्पिटल,रुंगटा बेलाविष्ठा बिल्डिंग,मुंबई नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण १११ तसेच दिंडोरी येथील ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजहिताचा आदर्श ठेवला.या शिबिरासाठी डॉ.नितीन देशमुख,रेडियंट हॉस्पिटल टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले,मेट्रो रक्त केंद्र,जिल्हा रुग्णालय नाशिक रक्तपेढीचे विशेष योगदान मिळाले.या शिबिरातील आकर्षण ठरले ते माजी सैनिक रवींद्र पदाडे,यांचे अनुकरणीय योगदान.त्यांनी ७४व्या वेळेस रक्तदान करून रक्तदात्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्याचप्रमाणे सतीश गुंजाळ, यांनी ३१वे रक्तदान योगेश उगलमूगले,१५वे रक्तदान करत समाजसेवेचे आपले कार्य पुढे चालू ठेवत उपस्थितांचे लक्ष वेधले.शिबिरात अनेक दाम्पत्यांनी एकत्र येऊन रक्तदान करीत समाजात माणुसकीचा संदेश दिला.त्यात शरद बोडके, मनिषा बोडके, नंदू सोनवणे,नयना सोनव...

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी - राज्यपाल आचार्य देवव्रत

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मुंबई, दि. 16 :- रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे,असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.‘संकल्प फाउंडेशन’ या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी ‘नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे असे सांगून रासायनिक...

आदिवासींच्या जल,जंगल,जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन  नागपूर, दि. १५ :- राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे.आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत येथील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे 15 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे राज्यम...

घुसघोर रोहिंग्या बांग्लादेशींवर कडक कारवाई करावी - मंत्री मंगलप्रभात लोढा

इमेज
मुंबई :- बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे.खोटे आधार कार्ड घेऊन हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत,फेरीवाले,भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण मुंबई काबीज करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गिरगाव मधील अशाच ८ घुसखोरांची खोटे आधार कार्ड जप्त केले.आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती,यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी त्यांनी माहिती दिली की,मालवणी परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.यात​ नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे ​आढळून आले आहेत.कायदेशीर करवाई झाली असून सुद्धा पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याची तयारी येथे सुरु झाली आहे.अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी,अशी म...

शिल्पकार राम सुतार यांच्या शिल्पांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. १४: विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.नोएडा (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, खासदार महेश शर्मा,महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते.शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार ...

न्यू मराठा हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक  :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे व जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रम इयत्ता नववी ब या वर्गाने सादर करत विद्यार्थी मनोगत श्रध्दा कुलकर्णी, अनुष्का कदम यांनी तर प्रश्नमंजुषा वेदिका पाटील,अंजली गुरुळे,यांनी केले.शिक्षक मनोगतातून आरती पवार,यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे, यांनी पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी,सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते.नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते.ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.ने...

बालदिनानिमित्त प्रभाग २३ येथे माजी नगरसेविका रुपाली निकुळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

इमेज
इंदिरानगर :- पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती,बाल दीन,तसेच बिरसा मुंडा जयंती निमित्त प्रभाग क्रमांक २३ मनपा शाळा क्रमांक ६५ बजरंग वाडी येथे रांगोळी स्पर्धेचे सह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी माजी नगरसेविका रुपाली निकुळे,यशवंत निकुळे,संध्या कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष भाजपा,वासंती विधाते,राजेंद्र यशोद,अनिकेत वझरे,शोभा साबळे,मुख्याध्यापिका,अनिता पाटोळे,योगिता पवार,निर्मला पाटील,सोनाली ठाकूर,भावना सोनवणे,फुलाबाई नागरे,यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थीउपस्थित होते.

न्यू मराठा हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

इमेज
न्यू मराठा हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करतांना उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी आदी (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रम इयत्ता नववी ब या वर्गाने सादर करत विद्यार्थी मनोगत श्रध्दा कुलकर्णी,अनुष्का कदम,यांनी तर प्रश्नमंजुषा वेदिका पाटील,अंजली गुरुळे यांनी केले.शिक्षक मनोगतातून आरती पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे,यांनी पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १...

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही

इमेज
राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार मुंबई,दि.१५ :- नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर स्वाक्षरी करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्याव...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन नाशिक दि. १३:- केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ‍ नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे,आमदार ॲड.राहुल ढिकले,आमदार दिलीप बनकर,आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली.रामकाल पथ प्...