Posts

वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. १६ : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने आयोजित सागरी शिखर परिषद २०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, परिवहन व बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ आदी उपस्थित होते.‘भारत मेरीटाईम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाईम व्हिजन २०४७’ मध्ये महाराष्ट्राचा सहभागकेंद्र सरकारच्या मेरीटाईम व्हिजनचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भविष्यात भारत हा जागतिक सप्...

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु

Image
मुंबई, दि. १६ :- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता महाडीबीटी प्रणालीवरून नवीन तसेच नुतनीकरण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची ऑनलाईन स्वीकृती १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे. मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी नोंदणीकृत अर्ज तत्काळ ऑनलाईन मंजूर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रवीकिरण पाटील यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे, नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी नूतनीकरण झालेल्या अर्जांचे प्रमाण नवीन अर्जांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी प्रथम प्राधान्याने नूतनीकरण अर्जांची पडताळणी करून ते ऑनलाईन मंजूर करावेत व मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.त्याचबरोबर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवनात बैठक मुंबई, दि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिक, आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल, अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे येथे उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच देवपूर,...

डॉक्टर,शेतकरी व सीए दिन उत्साहात साजरा लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवंततर्फे प्रेरणादायी सन्मान सोहळा नाशिकमध्ये संपन्न

Image
नाशिक :- लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवंततर्फे डॉक्टर, शेतकरी आणि चार्टर्ड अकाउंटंट दिन मोठ्या उत्साहात हॉटेल देवी इंटरनॅशनल, नाशिक* येथे साजरा करण्यात आला.समाजाच्या आरोग्य, शेती आणि आर्थिक व्यवस्थेतील योगदानासाठी या तीन क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात १० डॉक्टर्स, १० प्रगतशील शेतकरी आणि १० चार्टर्ड अकाउंटंट्स यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा टाळ्यांच्या गजरात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सूर्यवंशी, यांनी आरोग्य सजगतेबाबत मार्गदर्शन केले.सीए रोहित राठी यांनी तरुण उद्योजकतेतील संधी व कर साक्षरतेबाबत विचार मांडले. कृषीतज्ज्ञ भूषण निकम यांनी जैविक शेती आणि ब्रँडिंगबाबत माहिती दिली, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी यांनी सरकारी आरोग्य योजनांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन पिंपळगाव बसवंत क्लबचे अध्यक्ष लायन संदीप हिरे, झोन चेअरमन लायन राजेंद्र कोठावदे, उपाध्यक्ष व संयोजक लायन महेंद्र शेवाळे, सचिव लायन रविराज पाटील, खजिनदार लायन ज्ञानेश्वर लामबे, माजी झोन चेअरमन ला...

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीचे मुंबईत शोरुम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Image
AXIS CREDIT CARD APPLY महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शो रूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री मुंबई, दि.१५ जुलै, २०२५:महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून होते असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अध...

विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण साहित्य वाटप ना रोडला कार्यक्रम संपन्न

Image
ना.रोड :- "विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा" विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने,असंख्य नागरीक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ॐ साई लॉन्स, सिन्नर फाटा, नाशिक रोड येथे पार पाडला या सोहळ्यास मार्गदर्शन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस,अमोल भागवत,यांनी केले,आयोजन मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ, दिपक वाघ, नगरसेवक हरिश भडांगे,यांनी केले.आर्टिलरी चे कर्नल मच्छिंद्र सिरसाट,जयरामभाई हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुनील जाधव, मनपा नगरसेवक हरिशभाऊ भडांगे, मनपा नगरसेविका जयश्रीताई खर्जुल, मनसे महिला शहराध्यक्ष अक्षरा घोडके, भाजपा नेते, मा. नगरसेवक मधुसूदन गायकवाड, शिवसेनेच्या रोहिणी वाघ, हभप, साक्षी पळसकर, शिवसेना नेते योगेश भोर, विशाल कलेक्शन संचालक मयूर गणोरे, निर्भीड ज्योत संचालिका आशा कर्डक मोरे,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश करंजकर, शिवसेनेचे नितीन खर्जुल, अस्मिता देशमाने, भाजपच्या सुषमा गोराणे, स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखा जाधव, मनसे उपतालुकाध्यक्ष कैलास भोर, दिपक वाघ, रवी वाघमारे, अनिल मोरे, यांची प्रमुख उपस्थितीत लाभली....

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) आणि रोजगार कौशल्य वर्ल्ड स्किल डे निमित्ताने - डॉ.सतीश पवार संचालक युवा शक्ती फाउंडेशन यांचा लेख

Image
आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ शैक्षणिक पदव्या असून चालत नाही, तर उद्योग क्षेत्रात त्वरित रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्याकडे व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे तितकेच महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) ही संकल्पना अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरत आहे. WILP म्हणजे शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव यांचा समन्वय. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच उद्योगांमध्ये काम करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. यामुळे विद्यार्थी अधिक सक्षम, आत्मविश्वासी आणि रोजगारक्षम बनतात. उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, जे त्यांच्या कामासाठी तत्पर आणि तयार असते. 15 जुलै – वर्ल्ड स्किल डे ही जागतिक युवा कौशल्यांच्या सन्मानाची आणि जागरूकतेची दिनविशेष आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपण WILP सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले पाहिजे, जे केवळ कौशल्याभिवृद्धीस नव्हे तर रोजगार निर्मितीस आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरते. WILP ही संकल्पना नव्या भारतातील शिक्षण व उद्यो...

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, प्रज्ञा सातव, आयुक्त नयना गुंडे, सहायुक्त राहुल मोरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रभावी धोरण तयार करणे आवश्यक आहे. मुलींचा शैक्षणिक दर्जा, कौशल्यविकास आणि जीवनमूल्ये वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. बालगृहास प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच लोकप्रतिनिधी आणि विभागामध्ये चर्चा करून यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बालगृहातील मुलींच्या समस्या समजून घेण्यासाठी व...

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

Image
कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई नवी दिल्ली :- प्राप्तिकर विभागाने देशभरात एक व्यापक पडताळणी मोहीम सुरू केली असून, यामध्ये अशा व्यक्ती आणि संस्थांना लक्ष्य करण्यात आले आहे ज्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रांमध्ये (ITR) बनावट सूट आणि सवलतींचे दावे केले होते. ही कारवाई प्राप्तिकर अधिनियम, 1961 अंतर्गत लाभदायक तरतुदींचा गैरवापर करणाऱ्यांच्या तपशीलवार विश्लेषणानंतर करण्यात आली आहे. बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये व्यावसायिक मध्यस्थांची संगनमताची भूमिका असते. चौकशीत असे उघड झाले आहे की ITR तयार करणारे काही एजंट आणि मध्यस्थ एक संघटित रॅकेट चालवत आहेत, जे बनावट कपात आणि सवलतींचा दावा करत विवरणपत्रे भरत आहेत. या बनावट दावा प्रक्रियेत खोट्या TDS विवरणपत्रांचा वापर करून अतिरिक्त परताव्यांची मागणी केली जाते. संशयास्पद नमुन्यांची(पॅटर्न्सची) ओळख पटवण्यासाठी, प्राप्तिकर विभागाने त्रयस्थ-पक्षांकडून प्राप्त आर्थिक माहिती, प्रत्यक्षातील गोपनीय माहिती, तसेच प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणांचा वापर केला आहे. या निष्कर्षांची महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पं...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

Image
छत्रपती संभाजीनगर दि.१४:- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केंद्राची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, असे निर्देश त्यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहायक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगरप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत माहिती जाणून घेतली. मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा पर...

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे बनावट खतांच्या संदर्भात राज्यांना पत्र

Image
बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र नवी दिल्ली, दि.१४ : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते वेळेवर व योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री चौहान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी दर्जेदार खतांची वेळेवर उपलब्धता अत्यावश्यक आहे. त्यांनी बनावट खतांची विक्री, अनुदानावरील खतांचा काळाबाजार आणि जबरदस्तीने टॅगिंग करण्यासारख्या बेकायदा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही राज्यांची जबाबदारी असून, काळा बाजार, जादा किमतीत विक...

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना प्रत्येक हालचालींवर प्रशासनाची बारीक नजर

Image
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार मुंबई :- प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रायोगिक स्वरूपात बसवण्यात आल्यावर त्याचे सकारात्मक परिणाम पाहता, भारतीय रेल्वेने सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ होईल. असामाजिक तत्वे आणि संघटित टोळ्या निष्पाप प्रवाशांचा गैरफायदा घेतात, म्हणूनच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे अशा घटनांमध्ये मोठी घट होईल. तसेच प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार ठेवून, हे कॅमेरे डब्यांच्या दरवाज्याजवळील सार्वजनिक वावरण्याच्या भागामध्ये बसवले जाणार आहेत.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाचा आढावा घेतला. शनिवारी12 जुलै रोजी झालेल्या या बैठकीला रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.360 अंश संपूर्ण छायांकन रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “उत्तर रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांमध्ये यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. रेल्वेमंत्री यांनी 74,000 डब्यां...